शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात दोन महिन्यांत ३२ टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:16 IST

दोन महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला़ ६ आॅगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३०़२ टक्के इतर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ त्यामुळे ६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६२़१ टक्का पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात ३२ टक्के पावसाची तूट झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला़ ६ आॅगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३०़२ टक्के इतर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ त्यामुळे ६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६२़१ टक्का पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात ३२ टक्के पावसाची तूट झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे़जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७४़६२ मिमी एवढे आहे़ परंतु, २०१२ पासून ते २०१९ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीत केवळ २०१६ मध्येच जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती़ परंतु, त्यानंतर कमी अधिक होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होवून जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटत आहे़ मागील तीन वर्षापासून पाऊस सरासरी ओलांडत नसताना यावर्षी तरी समाधानकारक पाऊस होवून जिल्ह्यातील विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना होती़ परंतु, पावसाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ परंतु, अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही़ जिल्हा प्रशासनाने पावसाच्या केलेल्या नोंदीनुसार ६ आॅगस्टपर्यंत केवळ ३०़२ टक्के पाऊस झाला आहे़ यामध्ये परभणी तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ४९़१ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २५़९ टक्के पाऊस झाला आहे़ पालम तालुक्यात ६१़५ टक्के पाऊस होणे गरजेचे असताना २९़६ टक्के पाऊस झाला आहे़ पूर्णा ७४ टक्के अपेक्षित असताना ३६़७ टक्के पाऊस झाला आहे़ गंगाखेड ६५ टक्के अपेक्षित असताना ३१़२ टक्के पाऊस झाला़ सोनपेठ ६९ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३३़३ टक्के पाऊस झाला आहे़ सेलू ५१़५ टक्के पावसाची गरज असताना केवळ २४़६ टक्के पाऊस झाला आहे़ पाथरी तालुक्यात ५७़२ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २७़५ टक्के झाला आहे़ जिंतूर तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ६१ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३१़१ टक्के पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर मानवत तालुक्यात ७२़२ टक्के पाऊस अपेक्षित असताना केवळ ३४़५ टक्के पाऊस झाला़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी पाहता आतापर्यंत ६२़१ टक्के पाऊस होणे गरजेचे असताना केवळ ३०़२ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षीही ३२ टक्के पावसाची तूट दिसून येत आहे़ त्यामुळे भविष्यात चाºयाचा प्रश्न, पाणीटंचाई भेडसावणार आहे तर दुसरीकडे ज्या शेतीवर शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन असते ते सुद्धा बिघडणार आहे़सहा वर्षांत दोनदाच ओलांडली सरासरी४जिल्ह्यातील मागील सहा वर्षातील वार्षिक पर्जन्यमानाचा विचार केला असता, केवळ २०१३ व २०१६ मध्ये जिल्ह्याची ७७४़६२ मिमी वार्षिक सरासरी ओलांडून पाऊस झाला होता़ त्यानंतर मात्र एकदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नाही़ यामध्ये २०१२ मध्ये केवळ ६३८़४ मिमी पाऊस झाला होता़ २०१३ मध्ये पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावत सर्वाधिक ८८०़८८ मिमी पाऊस झाला होता़ त्यानंतर २०१४ मध्ये केवळ ३५८़६१ मिमी, २०१५ मध्ये ३४०़४६ मिमी पाऊस झाला़४२०१६ मध्ये वार्षिक सरासरी ओलांडत ८२६़४८ मिमी, २०१७ मध्ये ५३५़६१ मिमी तर २०१८ मध्ये ४८२़५१ मिमी पाऊस झाला होता तर यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन महिने उलटले आहेत़ आतापर्यंत ३७६़८३ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २३३़९१ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे किमान यावर्षी तरी पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरी ओलांडून आभाळाकडे डोळे असलेल्या बळीराजाला आनंद द्यावा, अशी अपेक्षा आहे़चौदा प्रकल्पांना पाण्याची आस४परभणी जिल्ह्यातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणाºया जिल्ह्यातील १४ प्रकल्पांना गतवर्षीपासून पाण्याची आस लागली आहे़४जिल्ह्यासह मराठवाड्याचे वैभव असणाºया जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण, करपरा मध्यम प्रकल्प, वडाळी प्रकल्प, कवडा प्रकल्प व मांडवी प्रकल्प, सिद्धेश्वर प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही़४सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्प, गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प, मुळी बंधारा, पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा, पाथरी तालुक्यातील मुदगल व ढालेगाव बंधारा, मानवत तालुक्यातील झरी तलाव, पालम तालुक्यातील तांदूळवाडी प्रकल्प ही चौदा प्रकल्पांना गतवर्षीपासून पाण्याची आस आहे़४हे प्रकल्प दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरले नाहीत़ त्यामुळे सिंचनाच्या प्रश्नांसह पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना झगडावे लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प