शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १०० योजना बंद पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:10 IST

जिंतूर तालुक्यात १०० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या खऱ्या; परंतु, प्रशासनाचा गलथान कारभार, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, अनेक गावांत झालेला अपहार, या कारणांमुळे जीवन प्राधिकरणाच्या ३, राष्टÑीय पेयजल योजनेच्या ४०, भारत निर्माणच्या ३९ व जलस्वज्यच्या १८ योजना बंद पडल्या आहेत.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यात १०० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या खऱ्या; परंतु, प्रशासनाचा गलथान कारभार, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, अनेक गावांत झालेला अपहार, या कारणांमुळे जीवन प्राधिकरणाच्या ३, राष्टÑीय पेयजल योजनेच्या ४०, भारत निर्माणच्या ३९ व जलस्वज्यच्या १८ योजना बंद पडल्या आहेत.तालुक्यात दहा वर्षापूर्वी येलदरी जलाशयामधून २३ गाव पाणीपुरवठा योजना सुरू केली. जीवन प्राधिकरणामार्फत असलेल्या या योजनेवर ३० कोटी रुपये खर्च झाले; परंतु योजनेचे पाणी दहा वर्षात शेवटच्या गावापर्यंत पोहचलेच नाही. १२ गाव पाणीपुरवठा योजनेवर १५ कोटी रुपये खर्च झाला. या योजनेचे पाणी केवळ पाच ते सात गावातच गेले. तसेच ही योजना नियमित सुरू नसते. पाणीटंचाईच्या काळात केवळ महिना-दोन महिने ठराविक गावांना पाणी दिले जाते. या योजनेच्या अनेक त्रुटी आहेत. प्राधिकरणाचा गलथानपणा व भोंगळ कारभाराचा ही योजना एक नमूना आहे. त्याचबरोबर १६ गाव कुपटा पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरली आहे. या योजनेवर २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मात्र एकाही गावाला या योजनेतून १२ महिने पाणी मिळाले नाही. विशेष म्हणजे, ही योजना पांढरा हत्ती पोसण्यासाठीच बनली आहे की, काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्यापपर्यंत या योजनेचे हस्तांतरण ग्रा.पं.कडे झालेले नाही. या विभागाचा कारभारच याला कारणीभूत असून वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे योजना असूनही ५१ गावे टंचाईग्रस्त बनली आहेत.राष्टÑीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४० योजना मंजूर होत्या. त्यापैकी केवळ १० ते १२ योजना कार्यान्वित आहेत. १९ योजना बंद असून उर्वरित १० योजना रखडल्या आहेत. ३१ कोटी ३ लाख रुपयांच्या योजनेमध्ये मोठा अपहार झाला असून पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व समितीने या योजना गिळंकृत केल्या आहेत. या अपहारासंबंधी जि.प.चे मुख्य कार्यकारी, जिल्हाधिकारी यांनी संबंधितांच्या सातबारावर बोजा टाकण्याबाबत वेळोवेळी आदेश देऊनही बोजा टाकण्यासाठी तलाठ्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.भारत निर्माण व जलस्वराज्य योजनेतही मोठा गैरप्रकार आहे. ३९ योजना मंजूर असून केवळ १९ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यातही अनेक योजना बंद आहेत. ८ योजनांचे पैसे बाकी असून दहा योजना रखडलेल्या अवस्थेत आहेत. तर २ योजनांच्या विहिरीचे वाद आहेत.२ कोटी ७६ लाख ८७ हजार रुपयांच्या या योजनेत ३७ लाख ७२ हजार ५३९ रुपयांचा अपहार झाला आहे. त्यामुळे या योजना पुढारी व गुत्तेदारांसाठी कुरण बनल्या आहेत. कोट्यावधी रुपये खर्चूनही ग्रामस्थांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.१०० गावांचा पाणीप्रश्न रखडलाजीवन प्राधिकरण योजनेतील ५१ गावे, भारत निर्माणची ३९ व पेयजल योजनेतून ४० गावे असे एकूण १३० गावे टंचाईमुक्त झाली असती. मात्र या योजना कुचकामी ठरल्याने १३० गावांपैकी १०० गावांचा पाणीप्रश्न रखडला आहे. या योजना कार्यान्वित असल्याने या गावात इतर योजनाही घेता येत नाहीत. परिणामी योजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जिल्हाधिकाºयांचा आदेश कागदावरचसहा महिन्यांपूर्वी अपहार झालेल्या योजनांच्या अध्यक्ष व सचिवांकडून रक्कम वसुलीसाठी सातबारावर बोजा टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले होते. मात्र जिल्हाधिकाºयांचे आदेश संबंधितांनी केराच्या टोपलीत टाकले आहेत. त्यामुळे आता कार्यवाहीचे काय होणार? हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.राजकीय गुत्तेदारी भोवलीयोजनेचे काम करणारे अनेक कंत्राटदार हे राजकारणाशी संंबंधित आहेत. योजना रखडल्याने रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत. अधिकाºयांवर वसुलीचा दबाव असला तरी कार्यवाही संथ गतीने सुरू आहे.जिल्हाधिकारी यांनी अफरातफर करणाºया पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्या सातबारावर बोजा टाकण्याबाबत आदेशित केल्यानंतर अनेकांच्या सातबारावर बोजा टाकण्यात आला आहेत.-एस.एस. जोशी कार्यकारी अभियंता,किती जणांच्या सातबारावर बोजे पडले हे नक्की सांगता येत नाही. मात्र याबाबत आपण नुकत्याच सूचना दिल्या आहेत.-सुरेश शेजूळ, तहसीलदार, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई