शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

परभणी जिल्ह्यात पालम पं.स. मध्ये पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:20 AM

येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पालम शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये दुसºया मजल्यावर पंचायत समितीचे कार्यालय आहे. ग्रामीण भागातील विकासासंदर्भात दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य आदींसह जबाबदार लोकप्रतिनिधींची नेहमीच या कार्यालयात उठ-बस असते. पंचायत समितीला कार्यालयाला पाणीपुरवठा करणारी विंधन विहीर मागील अनेक दिवसांपासून कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या इमारतीवर टाक्यांमध्ये पाणीच शिल्लक नाही. टँकरने पाणी घेणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या परिसरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झालेला आहे.विशेष म्हणजे, पिण्यासाठी तर सोडाच सांडपाणीही उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधींसह महत्त्वाच्या कार्यालयात पाण्याअभावी शौचालय बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयालाही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.तालुकाभरात उपाययोजना; पं.स.त मात्र हतबलता४यावर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी कोरडीठाक पडली असून गावतलवातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.४टंचाईग्रस्त गावातील ग्रामपंचातीच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. पाणींटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकाºयांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयावर पंंचायत समिती कार्यालयात बसूनच नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पंचायत समितीच्या कार्यालयातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असताना या कार्यालयातील पाण्याचा प्रश्न अधिकारी सोडवू शकले नाहीत, असेच म्हणावे लागेल. सध्या तरी येथील अधिकारी , कर्मचाºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ