शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात ३२३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, एका दिवसात ३२३ नव्या रुग्णांची भर पडली आहे; तर एका रुग्णाचा मृत्यू ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, एका दिवसात ३२३ नव्या रुग्णांची भर पडली आहे; तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

मागील एक आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज शंभर ते दीडशे रुग्ण नव्याने नोंद होत आहेत. शनिवारी आरोग्य विभागाला १ हजार ३९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या ७०८ अहवालांमध्ये २३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत; तर रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या ३३१ अहवालांमध्ये ९० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे मृत्यूचे सत्रही सुरूच असल्याने धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १० हजार ४७५ झाली असून, त्यापैकी ९ हजार २३९ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ८८८ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे १८३ रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होत आहेत. तर ५९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

परभणी तालुक्यात २१४ रुग्ण

परभणी तालुक्यातच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शनिवारी तालुक्यामध्ये २१४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातही हा संसर्ग वाढत असून, ४५ नवे रुग्ण या ठिकाणी आढळले आहेत. सेलू तालुक्यात ३३, गंगाखेड ९, पूर्णा ५, पाथरी ५, सोनपेठ १ आणि मानवत तालुक्यात ३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय परजिल्ह्यातील काही रुग्ण परभणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.