शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खत टंचाईचे शेतकऱ्यांसमोर नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

पेरण्या उरकल्यानंतर वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना खत दिले जाते. जून महिन्यात झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत ...

पेरण्या उरकल्यानंतर वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना खत दिले जाते. जून महिन्यात झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिके अंकुरली आहेत. त्यातच पाऊस गायब झाल्याने पिके कोमेजून जात आहेत. या पिकांना तग धरुन ठेवण्यासाठी खते दिलीे जात आहेत. त्यामुळेच खताला मागणी वाढल्याने बाजारपेठेत खताची टंचाई निर्माण करण्यात आली आहे. मोंढा बाजारपेठेत युरिया, डीएपी या खतांना मागणी आहे. मात्र खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे खत टंचाईमुळे शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत.

सद्यस्थितीला बाजारपेठेत युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी युरिया खत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या खताची कृत्रिम साठेबाजी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कडक भूमिका घेणे गरजेचे असताना याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची लूट होत आहे.

मागणी वाढली अन्‌ खत गायब

जिल्ह्यात युरिया खताची मागणी वाढत असतानाच बाजारपेठेतून हे खत गायब झाले आहे. विशेष म्हणजे इतर खते उपलब्ध असताना युरियाचीच टंचाई कशी झाली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. निर्माण झालेल्या टंचाईचा काहींनी लाभ उठवत चढ्या दराने खत विक्रीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता वाढली आहे.

भावफलक लावण्यास टाळाटाळ

प्रत्येक कृषी विक्रेत्याला त्याच्या दुकानासमोर उपलब्ध असलेल्या कृषी निविष्ठांचा भावफलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती देण्याचेही बंधनकारक केले आहे. मात्र मोंढा बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी भावफलक लावण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे खते, बियाणे किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना होत नाही.

प्रशासनाच्या नोंदीनुसार शिल्लक खत

युरिया : ५३५३

डीएपी : ३१५६

एमओपी : १८४१

एनपीके : १२११०

मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा

जिल्ह्यासाठी ६० हजार ५०० मे. टन युरिया खताची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात ३६ हजार २४२ मे. टन खत मंजूर झाले. त्यातही आतापर्यंत २६ हजार ३५३ मे. टन खत उपलब्ध झाले असून, त्यातील २१ हजार मे. टन खताची विक्री झाली असून, सध्या केवळ ५ हजार ३५३ मे. टन खत उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी डीएपी खताची टंचाई निर्माण झाली होती. डीएपी सध्या उपलब्ध असले, तरी त्यासोबत याच कंपनीच्या जास्तीच्या खताचे एक पॅकेट खरेदी करणे बंधनकारक केले जात आहे. यातूनही शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे.