शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गोन्नत’ उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:18 AM

परभणी : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर आता ...

परभणी : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर आता ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची एकही दिवस शाळा झालेली नाही. अशातच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ६ एप्रिल रोजी एक आदेश काढून घेतला आहे. त्यानंतर ९ व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही हाच निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर काय नोंद केली जाणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती; परंतु शिक्षण विभागाने याबाबत लेखी आदेश काढून पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आता विद्यार्थी, पालकांना प्रत्यक्ष प्रगतिपत्रक हातात कधी पडते, याकडे लक्ष लागले आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा झाला फायदा

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षभरात एकदाही शाळा भरली नसली तर या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे या ऑनलाईन शिक्षणात काही भागांत अडचणी आल्या असल्या तरी अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. अनेक शिक्षकांनी तर आपला अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. त्यामुळे या ऑनलाईन शिक्षणाचा फायदाच झाला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या संदर्भातील सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना लवकरच प्रगतिपत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी

कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरू झाली नाही; पण गडम सर यांनी दिलेले ऑनलाईन शिक्षण व स्वाध्याय यावरच वर्गोन्नती मिळत आहे. खरे तर निकालपत्रात श्रेणीवरून आमची गुणवत्ता कळत होती. मात्र वर्गोन्नतीचा शेरा आल्याने सर्वांना एकाच रांगेत बसावे लागले आहे.

- सोनाली सोनवणे, वालूर

सर्वांसोबत शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती; परंतु यावर्षी शाळा सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे वर्षभर घरात बसून कंटाळा आला आहे. एकही दिवस वर्गात न बसता आणि शिक्षक कोण आहेत, हे माहीत न होताच पुढच्या वर्गात जात आहे, याबाबत समाधान वाटत नाही.

- सार्थक गिणगिणे, वालूर

कोरोनामुळे वर्षभर शाळेत न गेल्याने शिक्षकांकडून प्रत्यक्ष शिकवण्याचे काम झाले नाही; पण कटारे सर हे आठवड्यात एक ते दोन वेळा घरी येऊन स्वाध्याय तपासून मार्गदर्शन करीत होते. यावरच यावर्षी मी पुढच्या वर्गात गेले; पण घरात बसून कंटाळा आला आहे.

- प्रणिता मोरे, देवगांवफाटा