शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढली गुटख्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST

शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था परभणी : शहरातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे . त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे ...

शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था

परभणी : शहरातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे . त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे . लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या स्वच्छतागृहांची केवळ देखभाल दुरुस्ती नसल्याने ही अवस्था झाली आहे . महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. तेव्हा सर्व स्वच्छतागृह वापरात आणावेत,अशी नागरिकांची मागणी आहे.

उखडलेल्या रस्त्यामुळे अपघातांना निमंत्रण

परभणी : येथील वसमत रस्त्यावरील असोला पाटी ते झिरोफाटा हा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना एकेरी मार्गावरुन वाहतूक करावी लागते. आधीच खड्डेमय रस्ता त्यात एकेरी वाहतूक होत असल्याने वाहनधारकांना हा रस्ता पार करताना कसरत करावी लागते. महामार्ग प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

असुविधा वाढल्याने प्रवाशांची गैरसोय

परभणी : येथील बसस्थानकावर असुविधा निर्माण झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पुरेशी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आदी असुविधांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. महामंडळ प्रशासनाने याठिकाणी प्रवाशांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन दिल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे .

पाणी आवर्तनाची नागरिकांना प्रतीक्षा

परभणी : जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी तिसरे पाणी आवर्तन द्यावे, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या गहू आणि हरभरा ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. दुसऱ्या पाण्याच्या आवर्तनानंतर मोठा खंड पडला असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे . पिकांना पाण्याचा ताण पडू नये, यासाठी पाटबंधारे विभागाने तिसऱ्या पाण्याचे आवर्तन मंजूर करावे, अशी लाभार्थी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बाजारपेठ भागात वाहनतळाचा अभाव

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात वाहनतळासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहतुकीच्या समस्या वाढत आहेत. बाजारपेठेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. मनपाने वाहनतळासाठी निश्चित केलेल्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने वाहनतळावरील अतिक्रमण हटवून वाहनतळाच्या जागा खुल्या करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.