शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडापाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील प्रावीण्याबद्दल मिळणारी गुणांची सवलत यंदा न देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील प्रावीण्याबद्दल मिळणारी गुणांची सवलत यंदा न देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता रेखाकला परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही या गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चित्रकला विषयासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांत यश संपादन करणाऱ्या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांना चित्रकला परीक्षेत मिळणाऱ्या ग्रेडनुसार दहावीच्या गुणांमध्ये वाढीव गुण दिले जातात. मागील वर्षी जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थी कला क्षेत्रात नैपुण्य दाखवितात. क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कला क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी मिळविलेले नैपुण्याची दहावी इयत्तेच्या गुणांमध्ये नोंद घेतली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने हे गुण न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

मागील वर्षी जिल्ह्यातील अकरा हजार विद्यार्थ्यांनी इलेमिंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे कौतुक करण्यासाठी हे गुण देणे आवश्यक आहे. शासनाच्या या निर्णयाविषयी कलाध्यापक संघासह विद्यार्थ्यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असून, रेखाकलेचे गुण विद्यार्थ्यांना अदा करावेत, अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तर त्यांना गुण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे गुण दिले जातात. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना या गुणांमुळे प्रोत्साहन मिळते. रेखा कला परीक्षेचे गुण तर विद्यार्थ्यांना द्यावेतच. शिवाय क्रीडाच्या १० गुणांप्रमाणेच या या परीक्षेसाठीही १० गुण दिले जावेत.

माधव घयाळ, कलाध्यापक

शासनाने यावर्षी शासकीय रेखा कला परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरले जाणार आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांंचे प्रस्ताव दाखल केले आहेत, त्याचाही शासनाने विचार केला नाही. हा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काचे गुण त्यांना देऊन कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे.

के.एस. लगड, कलाध्यापक