शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ भागातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST

शहरात जलवाहिनीला गळती परभणी : शहरातील जुन्या जलवाहिनीला अनेक भागांत गळती लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नळाला पाणी ...

शहरात जलवाहिनीला गळती

परभणी : शहरातील जुन्या जलवाहिनीला अनेक भागांत गळती लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नळाला पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपा प्रशासनाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

जिल्हा कचेरीत वाहनतळाचा बोजवारा

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहनतळासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहनधारक वाहनतळावर वाहने उभी करण्याऐवजी थेट प्रवेशद्वारापर्यंत वाहने नेतात. त्यामुळे नागरिकांना वाहनांचा अडथळा पार करून कार्यालयात प्रवेश करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता प्रशासनाने नियम डावलणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

दुभाजकावरील झाडे सुकू लागली

परभणी : शहरातील वसमत रोड आणि जिंतूर रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर झाडे लावली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ही झाडे आता सुकू लागली आहेत. मनपा प्रशासनाने पाणी देण्याचे नियोजन केल्यास झाडे टिकून राहतील.

पूल उभारण्याच्या कामाला गती

परभणी : गंगाखेड रस्त्यावर शहरालगत पिंगळगड नाल्यावर पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असून, पूल उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा पूल धोकादायक झाला होता. नवीन पुलाची उभारणी होत असल्याने वाहनधारकांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

ग्रामीण भागातील वातावरण पुन्हा तापू लागले

परभणी : सहकार क्षेत्रातील सोसायट्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आगामी काळात होत असल्याने ग्रामीण भागात आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. सहकारी सेवा सोसायट्यांना ग्रामीण भागात महत्त्व आहे. त्यामुळे या सोसायट्या आपल्याच ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपाठोपाठ आता सोसायट्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.

स्टेडियम भागात स्वच्छतागृहाचा अभाव

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरामध्ये स्वच्छतागृह नसल्याने व्यावसायिक आणि नागरिकांची अडचण होत आहे. या भागात दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, स्वच्छतागृह नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपाने स्वच्छतागृहांची उभारणी करणे गरजेचे झाले आहे.