शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार हेक्टरवरील पिकांना मिळेना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

गंगाखेड : यावर्षी झालेल्या पावसामुळे पैठण व माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, या दोन्ही धरणांतील पाणी रब्बी ...

गंगाखेड : यावर्षी झालेल्या पावसामुळे पैठण व माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, या दोन्ही धरणांतील पाणी रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याचे अद्यापपर्यंत नियोजन झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्‍टरवरील पिके पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. तालुक्यातील मैराळ सावंगी, गोंडगाव, चिंचटाकळी, ब्राह्मणवाडी, खळी तांडा, खळी, महातपुरी, दुसलगाव, अंबरवाडी, मुळी, धारखेड, नागठाणा आदी शिवारातील १८ हजार हेक्टर शेत जमिनीतील रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडणे गरजेचे आहे. मात्र, यावर्षी पैठण आणि माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. या पाण्याचा फायदा अद्यापही गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेला नाही. विशेष म्हणजे माजलगाव व पैठण धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याबाबत कुठलेही नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीला लाभक्षेत्रातील १८ हजार हेक्‍टर शेतजमिनीवरील पिकांसाठी पाण्याची गरज आहे. मात्र, हे पाणी अद्याप सोडण्याबाबत कोणतेही नियोजन न झाल्याने उन्हाळी हंगामातील भुईमूग, मका, भाजीपाला तसेच रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माजलगाव व पैठण धरण प्रशासनाने तातडीने पावले उचलत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.