शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बेफिकीर तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

परभणी : घराच्या बाहेरही पाऊल ठेवलेला नसताना अनेक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे प्रकार परभणीत ...

परभणी : घराच्या बाहेरही पाऊल ठेवलेला नसताना अनेक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे प्रकार परभणीत घडले आहेत. तरुण मंडळी विनाकारण घराबाहेर फिरते. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना कोरोना संसर्गाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन, सॅनिटायझरचा वापर या बाबीही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, कामानिमित्त आणि काम नसताना घराबाहेर पडणारी तरुण मंडळी ‘मला काही होत नाही’ या आविर्भावात प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाही. घरी गेल्यानंतरही आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. परंतु, त्याचा फटका मात्र घरातील ज्येष्ठ मंडळी आणि बालकांना सहन करावा लागत आहे. यातून स्वत:चे कुटुंबच अडचणीत आणण्याचा प्रकार होत आहे. तेव्हा कामानिमित्तच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. तेव्हा नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळतात. त्यांना कोरोना कसा झाला, याचा साधा विचार केला तरी बाधित कुटुंबातील युवकांकडे लक्ष जाते. हे युवक घराबाहेर पडतात आणि त्यांच्या माध्यमातून घरातील इतर मंडळी बाधित होत असल्याचे दिसून येत आहे.

लहान मुलांच्या बाबतीतही हेच होत आहे. मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुले घरातच आहेत. मात्र, घरातील एका व्यक्तीला कोरोना झाला की, त्याची बाधा मुलांपर्यंत पोहोचत आहे. अशी उदाहरणेही शहरात आता जागोजागी दिसू लागली आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांनीच आता कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.

घरात जाण्यापूर्वी स्नान करावे, शक्यतो सर्व कपडे त्याच दिवशी भिजवून धुण्यासाठी द्यावेत. मोबाइल, बेल्ट, पॉकेट सॅनिटाइझ करून घ्यावे.

घरामध्ये वावरत असताना शक्यतो मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून काही अंतर ठेवूनच संवाद साधावा. घरीदेखील मास्क वापरावे.

बाहेरून घरी आल्यानंतर वाफ घ्यावी. सॅनिटायझरच्या साह्याने हात स्वच्छ धुवावेत. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.