शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

corona : कोरोनाची धास्ती; स्थलांतरीत अडीच हजार ग्रामस्थ सेलू तालुक्यात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 2:35 PM

प्रशासनाकडून नोंदणी ठेवण्यात येत आहे

सेलू:- कोरोनाच्या धास्तीने  सेलू तालुक्यातील ९४ गावातील     रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेले  अडीच हजार ग्रामस्थ आजपर्यंत  आपल्या गावी परतले असल्याची माहिती गाव पातळीवर  सुरू करण्यात आलेल्या  सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. 

तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील भूमीहीन आणि शेत मजूरांचे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जाऊन  मिळेल ते काम करून प्रत्येक गावातील शेकडो कुटूंब महानगरात स्थलांतरीत झाले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने राज्यातील महानगरे आणि शहरे लाॅक डाऊन केले आहेत. त्यामुळे शहरात कुठेच काम उरले नसल्याने आणि खासकरून पुणे आणि मुंबईत कोरोना विषाणूचे संशयित रूगणाची संख्या वाढत असल्याने महानगरात स्थलांतरीत झालेल्या ग्रामस्थांनी कुटूंबासह आपले गाव गाठले आहे. मागील आठवड्यात पुणे, मुंबई, नाशिक येथून बस आणि रेल्वेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत आपल्या गावी परतले आहेत. महसूल आणि आरोग्य विभागाच्या यंञनेने बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांची माहिती गाव पातळीवर शासकीय यंञणेच्या माध्यातून एकञ केली जात आहे. दरम्यान,  उजाड झालेले गाव खेडी स्थलांतरित झालेले ग्रामस्थ परतल्याने  गजबजले आहेत. 

दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश 

बाहेर गावाहून आलेल्या ग्रामस्थांची नोंद पोलीस पाटील यांना करावी लागत आहे. त्यासाठी एक स्वतंत्र रजिस्टर ठेवण्याच्या सुचना सर्व पोलीस पाटलांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावातील आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी कार्यकती यांनी गावात प्रत्यक्ष गृह भेटी देऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा माहिती अहवाल दररोज आरोग्य विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच बाहेर गावाहून परतलेल्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप येत असलेतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ज्यांना कुठलेही कोरोनाचे लक्षणे आढळून आली नाहीत अशानाही घरची थांबण्याचे सांगितले जात आहे. 

परदेशातून परतलेले सर्व निगेटिव्ह 

 अमेरिका, दुबई या  परदेशातून शहरात परतलेल्या सर्व सहा नागरिकांचे स्वॅब घेऊन त्याची चाचणी घेतली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.माञ त्यांना घर न सोडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी लोकमत शी बोलताना दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस