शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार १७३ शेतकरी झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

परभणी: जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात ...

परभणी: जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात आणले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७ हजार १७३ शेतकऱ्यांनी ३ कोटी रुपयांचा वीज बिल भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत.

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना दररोज पैसे द्यावे लागतात. मात्र महावितरणकडून वीज ग्राहकांना पुरवठा करण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा वेळेत होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या थकबाकीमुळे चालू देयके व थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली. मात्र या मोहिमेलाही कृषीपंपधारक व वीज ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीसमोर जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांची थकबाकी वसुली कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी राज्य शासन व महावितरण कंपनीच्या समन्वयातून महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वीज ग्राहक व कृषीपंपधारकांनी आपल्याकडे असलेल्या थकबाकीचा भरणा केल्यास विलंब आकार व बिलातील व्याजातील सूट देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणाऱ्या ७ हजार १७३ शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत ३ कोटी रुपयांचा थकबाकीचा भरणा केला आहे. त्यामुळे हे शेतकरी आता थकबाकीतून मुक्त झाले आहेत. मात्र या योजनेला घरगुती, वाणिज्य, लघुदाब, औद्योगिक, वीज ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील जवळपास ३०० हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

५९४ कोटी रुपयांची मिळणार माफी

राज्य शासन व महावितरण कंपनीच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे भरल्यास कृषीपंपधारकांना विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ५७४ कोटी ७ लाख रुपयांची माफी मिळणार आहे. त्यामुळे महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत १,३८६ कोटी रुपयांपैकी ९६ हजार ८७० शेतकऱ्यांना केवळ ८११ कोटी ९३ लाख रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचा सत्कार

गंगाखेड उपविभागांतर्गत येणाऱ्या कृषीपंपधारकांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत आपल्या थकबाकीचा भरणा वीज वितरण कंपनीकडे केला आहे. हे शेतकरी महावितरणसाठी तारणहार ठरत असल्यामुळे गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागात कार्यकारी अभियंत्याच्या उपस्थितीत थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.