शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे ३ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

परभणी : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ९३ हजार ५९६ विद्यार्थी यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार ...

परभणी : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ९३ हजार ५९६ विद्यार्थी यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाचा या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून विविध माध्यमातून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील २ लाख ९३ हजार ५९६ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यात पहिली ते पाचवीचे १ लाख ८६ हजार १२१ आणि सहावी ते आठवीच्या १ लाख ७ हजार ४७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षणमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर आता या संदर्भात प्रत्यक्ष शिक्षण विभागाकडून आदेश कधी काढला जातो, याकडे सर्व विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. या निर्णयाबाबत पालकांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी विद्यार्थ्यांची थेट परीक्षाच रद्द करणे योग्य नाही. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. त्यामुळे शासनाने अन्य मार्गाचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांची परीक्षा होणे आवश्यक आहे.

- गणेश काळे, पालक

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ऑफलाईन परीक्षा घेतल्या तर विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढच्या वर्षी घेतल्या तरी चालतील. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे.

- अशोक पाटील, पालक

आजच्या स्पर्धेच्या युगात परीक्षा पद्धत असणे गरजेचे आहे. त्याची सवय शालेय जीवनापासून मुलांना लागली पाहिजे तरंच ते भविष्यात यशस्वी होतील. आता परीक्षाच नाही म्हटल्यावर विद्यार्थी अभ्यास कशाला करतील? त्यांना अभ्यासाविषयी गोडी राहणार नाही. परीक्षा असायलाच हवी.

- एजाज पटेल, पालक

विद्यार्थ्यांची परीक्षा झालीच पाहिजे. सद्यस्थिती अवघड असली तरी यावर उपाय शोधला पाहिजे. यासाठी ऑनलाईन परीक्षा किंवा एखादा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व कळायला हवे.

- प्रवीण सोनोने, शिक्षक