शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

परभणीत २७ कोटींची वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:36 IST

महसूल विभागाने जिल्ह्यात २६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची अवैधरित्या असलेली ५३ हजार ५९७ ब्रास वाळू जप्त केली असतानाही या वाळूसाठ्यांचा लिलाव एकीकडे केला नसताना दुसरीकडे बाजारात वाळूचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी तब्बल ५ हजार रुपये ब्रासने वाळू विक्री होत असल्याचा प्रकार जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महसूल विभागाने जिल्ह्यात २६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची अवैधरित्या असलेली ५३ हजार ५९७ ब्रास वाळू जप्त केली असतानाही या वाळूसाठ्यांचा लिलाव एकीकडे केला नसताना दुसरीकडे बाजारात वाळूचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी तब्बल ५ हजार रुपये ब्रासने वाळू विक्री होत असल्याचा प्रकार जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.परभणी जिल्ह्यातील गोदावरी, दुधना, पूर्णा या प्रमुख नद्यांमधून सातत्याने अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याचे प्रकार अनेक वर्षांपासून घडत आहेत. काही वाळू माफिया लिलाव झाला नसलेल्या वाळू घाटावरुन वाळूची चोरी करीत असतानाही अनेक ठिकाणी प्रशासनाला ही वाळू चोरी रोखता आलेली नाही. हे वाळू माफिया खाजगी व शासकीय जागेवर वाळूचे साठे निसंकोचपणे करीत असल्याचे पहावयास मिळाले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काही दिवसांपासून या संदर्भात कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आॅक्टोबर अखेरपर्यंत प्रशासनाने तब्बल ६७६ वाळू घाटातील ७८ हजार ८२ ब्रास वाळू जप्त केली होती. त्यातील २४९ वाळूसाठ्यातील २४ हजार ४८५ ब्रासचा लिलाव शासकीय दरानुसार करण्यात आला. यातून प्रशासनाला ४ कोटी २८ लाख ५८ हजार २४७ रुपयांचा महसूल मिळाला.अद्याप प्रशासनाकडे ४२७ वाळूसाठ्यातील ५३ हजार ५९७ ब्रास वाळू शिल्लक आहे. या वाळूचा अद्यापही लिलाव झाला नसल्याने ती जप्त केलेल्या जागेवरच पडून आहे. त्यातील अनेक ब्रास वाळूची चोरीही होत आहे. परंतु, जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचे वेळेवर लिलाव होत नाहीत. अशातच जिल्हाधिकाºयांनी अवैध रेती उपस्यासंदर्भात कडक भूमिका घेतल्याने वाळू माफियांची गोची झाली आहे. यातून जिल्हाभरात वाळूचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात तब्बल ५ हजार रुपये ब्रासने वाळू उपलब्ध होत आहे. खाजगी व्यक्तींना बांधकाम करायचे असल्यास एक टिप्पर ज्यामध्ये ३ ब्रास वाळू असते त्यासाठी १५ हजार रुपये मोजावे लागत आहेत.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाºया टिप्परवर कारवाई करीत असल्याने रात्रीच्या वेळी ही वाळू खाजगी व्यक्तींना पुरविली जात आहे. एकीकडे कृत्रिम तुटवड्यामुळे १७०० ते १८०० रुपये ब्रासने मिळणारी वाळू तब्बल ५ हजार रुपये ब्रास दराने विकली जात असताना महसूल विभागाच्या ताब्यात असलेली ५९ हजार ५९७ ब्रास वाळू ज्याची ५ हजार रुपये प्रति ब्रास बाजारभावाने २६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपये किंमत होते, ती लिलावाच्या माध्यमातून खुल्या बाजारात का आणली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाºयांनीच याकडे लक्ष देऊन उपलब्ध असलेल्या वाळूसाठ्यांचा खाजगी व्यक्तींकरीता लिलाव केला तर शासनाच्या महसुलात भर पडेल. शिवाय जेथे ५ हजार रुपये ब्रासने खाजगी व्यक्तींना नाईलाजाने वाळू घ्यावी लागते, त्या व्यक्तींना १७०० ते १८०० रुपये ब्रासने वाळू मिळाल्यास त्यांना बसणारा आर्थिक फटकाही कमी होऊ शकतो. परंतु, यासाठी जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे.डापकर यांना वाळूपट्ट्यातच पदभाराचा योगायोगजिल्हाधिकारी कार्यालयात दोन तहसीलदार कार्यरत असतानाही सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांना गोदावरीच्या वाळूपट्ट्यात असलेल्या दोन तालुक्यांमध्येच अतिरिक्त पदभार मिळत असल्याचा योगायोग सध्या घडत आहे. डापकर यांच्याकडे सोनपेठच्या तहसीलदारपदाचा कायमस्वरुपी पदभार आहे. त्यानंतर त्यांना काही महिन्यांपूर्वी पालमच्या तहसीलदारपदाचा पदभार देण्यात आला होता.गंगाखेडचे तहसीलदार आसाराम छडीदार हे रजेवर गेल्यानंतर पालमचा डापकर यांच्याकडील पदभार याच तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार कदम यांच्याकडे देण्यात आला आणि गंगाखेडचा पदभार डापकर यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे पालमचा पदभार डापकर यांना देत असताना, त्यावेळी नायब तहसीलदार कदम यांची प्रशासनाला आठवण कशी काय झाली नाही आणि गंगाखेडचा पदभार देताना मात्र पालमसाठी कदम यांची आठवण प्रशासनाला कशी काय झाली, हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे.पालममध्ये अनेक ठिकाणी वाळूसाठेपालम तालुक्यात पिंपळगाव, राहटी, दुटका, गुंज, भोगाव, सोमेश्वर, आरखेड, उमरथडी, खुर्लेवाडी, रावराजूर, सावंगी भू. या गाव शिवारात अद्याप अवैध वाळूसाठे शिल्लक आहेत. विशेष म्हणजे वाळूसाठ्यांप्रकरणीच येथील तहसीलदार आर.के. मेंडके यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.अवैधरित्या केलेले वाळूसाठे प्रशासनाने जप्त करुन काही ठिकाणी त्याचे लिलाव केले. त्यातून तब्बल २ कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला. एकीकडे जिल्हाधिकारी अवैध वाळूसाठ्यासंदर्भात कडक भूमिका घेत असताना दुसरीकडे त्यांना इतर अधिकाºयांची फारसी साथ मिळत नसल्याने जप्त केलेल्या साठ्यातून वाळूची चोरी होत आहे.गंगाखेड तालुक्यात वाळूचे ढीग कायमगंगाखेड तालुक्यात अवैधरित्या साठा केलेल्या वाळूचे ढीग अनेक ठिकाणी कायम आहेत. महसूल विभागाने यातील अनेक साठे जप्त केले असले तरी त्या साठ्यांचा लिलाव झालेला नाही. यामध्ये पिंपरी, मसला, कासारवाडी, गंगाखेड, महातपुरी, मुळी येथील वाळूसाठ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गंगाखेड येथील वाळू लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत जाते. या भागातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे टिप्पर कधी परळीमार्गे तर कधी राणीसावरगावमार्गे तर कधी कोद्रीमार्गे लातूरच्या दिशेने जातात. काही टिप्पर परळीमार्गे बीड जिल्ह्यातही वाळू घेऊन जातात.