शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा का घ्यावा लागतो?

By admin | Updated: February 25, 2016 21:51 IST

एक साधा प्रश्न. एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नात

एक साधा प्रश्न.एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नातमुलीकडून हुंडा का घेतात?‘आॅक्सिजन’ला आलेलीपत्रं आणि ई-मेल्समध्ये बारीक नजरेनं शोधून पाहिलं,तर सापडतातचक्रावून टाकणारीकाही उत्तरंमुलीकडच्यांना शहरातलाच पोरगा हवा,तोही शक्यतो सरकारी नोकरीवाला.त्यातही पोलिसांत, महसूल खात्यात,एरिगेशनवाला असेल तर सोन्याहून पिवळं.नाहीतर बॅँक/एलआयसी त्यातल्या त्यात बरं,अशी पोरं गाठायची म्हणून मुलींचे वडीलपैशाच्या पोत्यांची तोंडं उघडतातआणि जास्त हुंडे देऊन का होईनासुपारी फोडतात.शहरी/नोकरीवाला मुलगाच पाहिजे,हा आग्रह हुंड्याच्या रकमा वाढवतो आहे.हुंडा नको असं म्हणणाऱ्या मुलालाखेड्यापाड्यात कुणी मुलगी देत नाहीत,असाही अनुभव येतो म्हणतात.कारण ‘अशा’ मुलाबद्दल शंका येतात.याचं आधी लग्न झालेलं असलं पाहिजे,काहीतरी शारीरिक दोष असणार,काहीतरी कमी असणार असं म्हणतमुलींचे वडील हुंडा नको म्हणणाऱ्यांनाबाहेरचा रस्ता दाखवतात.‘शिक्षण संस्था, बॅँका,खासगी कंपन्यांमध्ये मुलालापर्मनण्ट नोकरी मिळेल, त्यासाठीफक्त काही लाख द्या,पगार तर काय मरेपर्यंत तुमची मुलगीच खाणार,’असं म्हणत मुलीच्या वडिलांकडूनकाही लाख घेतले जातात.ते दिलेही जातात,पुन्हा कारण तेच, शहरी-नोकरीवाला मुलगा हवा.आपण किती हुंडा घेतला,हे सांगणंच नव्हे तरआपण किती हुंडा दिला हे सांगणंही समाजातसध्या अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात आहे.थेट रोख रकमेचा हुंडा आता मागितला जात नाही,त्याऐवजी आलिशान लग्न, दागिने, गाड्या, घर,नोकरीसाठी पैसा ते देश-विदेशातील हनिमून पॅकेजया स्वरूपात देवाणघेवाण होते आहे.घरच्या मुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करून हुंडा दिलेला असतोच, त्याची भरपाई म्हणूनमुलांच्या लग्नात हुंडा घेणं हे जनमान्य!‘दिला, मग घ्यायचा का नाही?’- हे तर्कट सांगून नव्या विचारांच्यामुलांना हुंड्यासाठी तयार करूनइमोशनल ब्लॅकमेल करण्याचंही प्रमाण बरंच मोठं असावं, असं ही पत्रं सांगतात.अनेक मुलांना हुंडा ही आपल्या गुणवत्तेची सामाजिक पत आहे असं वाटतं.जितका हुंडा जास्त,तितका आपल्याला समाजात मान जास्त,असं त्यांचं मत बनतं आहे.हुंड्यापायी होणारा छळ पाहून मुलींचा हुंड्याला विरोध असतो,पण तो विरोध व्यक्त केला तर आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही, अशी भीती मोठी असते.घरच्यांचा धाक आणि हुंडा देऊन,लग्नाचा खर्च करण्याची अपरिहार्यता.कर्ज काढून, शेती विकून लग्नासाठी पैसा उभा करणारे हतबल वडील पाहूनअनेकींना मनस्वी त्रास होतो.त्याउलट वडिलांनी आपलं लग्न थाटामाटात करून द्यायला हवं,सगळा संसार, दागदागिने, हवी ती वस्तू द्यायलाच हवी,तो आपला हक्कच आहे, असं वाटणाऱ्याही काही मुलीया पत्रांमध्ये भेटतात.हुंडा घेऊ नये,हुंडा ही अत्यंत वाईट परंपरा आहे, यावरवैचारिक एकमत म्हणावं इतकी सहमती आहे.मात्र तो ‘नाईलाज’ म्हणून घ्यावा लागतो,असा बहुसंख्य तरुण मुलांचा सूर!