शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणानं लग्न करायला काय हरकत आहे?

By admin | Updated: October 30, 2014 19:55 IST

साध्या लग्नाच्या आणि नंतरच्या अत्यंत साध्या लाईफस्टाईलच्या कहाण्या आपण वाचलेल्या असतात. पण नेमकी लग्न करायची वेळ येते तेव्हा कुठं जातं हे शहाणपण?

साधेपणानं लग्न केलेली कितीतरी जोडपी आपल्या अवतीभोवती असतात. नारायण आणि सुधा मूर्तीसारख्यांच्या साध्या लग्नाच्या आणि नंतरच्या अत्यंत साध्या लाईफस्टाईलच्या कहाण्या आपण वाचलेल्या असतात. पण नेमकी लग्न करायची वेळ येते तेव्हा कुठं जातं हे शहाणपण? साधेपणानं लग्न केलं अगदी ‘व्यवहार’ डोळ्यासमोर ठेवून जरी केलं तरी बरेच फायदे आहेत.
मात्र त्यासाठीच हे काही ‘जिव्हारी’ लागणारे प्रश्न.
 
1) एकतर जेवणावळी, डेकोरेशन, देणीघेणी यावरचा अवास्तव खर्च टळतो. त्यातून वाचलेला पैसा आपण आपल्यासाठी कुठं गुंतवू शकतो. विशेषत: मुलींच्या वडिलांनी तो पैसा मुलींच्या नावे फिक्स डिपॉङिाट करावा. (म्हणजे मुलीला द्यायचा असा हट्टच असेल स्वत:चा आणि मुलीचा तर.) अर्थात मुलींनी तरी का म्हणून सांगू नये की, मला नको हा पैसा नि खर्च. माझं लग्न साधेपणानंच करा.
 
2) लग्न ठरलं की विचारतो का आपण एकमेकांना की, पैशाचं प्लॅनिंग कसं करणार? कुठली बिलं कोण भरणार? आर्थिक जबाबदारी नक्की कुणाची? 
 
3) ज्या मुलांना एरव्ही सगळ्यासंदर्भात स्वातंत्र्य हवं असतं त्यांनी आईवडिलांचा पैसा स्वत:च्या लग्नासाठी उडवणं, वापरणं किती बरोबर याचाही विचार करावा. आपण स्वकमाईचे पैसेसुद्धा अनाठायी उधळत नाही मग पालकांचे कष्टाचे पैसे असे का उडवावेत?
 
4) लाईफस्टाईलचा आपला आग्रह काय, महागडे गिफ्ट्स, प्रवास, हॉटेलिंग, दागिने हे हवंच असेल तर सांगतो का एकमेकांना की गृहीत धरतो लग्नाच्या नावाखाली?
 
5) साधेपणातून लग्न म्हणजे परस्पर विश्वास, सामंजस्य, आणि एकमेकांना साथ देत नव्या आयुष्याची सुरूवात असं आपण मानतो की लग्नातला तामझामच जास्त महत्त्वाचा वाटतो?