शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सोशल

By admin | Updated: December 11, 2015 14:04 IST

कुणी आज काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लग्नाच्या वाढदिवसाला केलेल्या खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून वेगळा काय संपर्क ठेवायचा, असं तरुण मुलं का म्हणतात?

- घराबाहेर न पडताही ‘संपर्कात’ राहणारी एक नवीन जीवनशैली!
‘काय सारखं फोनवर टुकटुक,
शेजारी बसलेला माणूस जिवंतय की मेलाय, हे तरी बघा जरा!’
‘सगळं ऑनलाइन करा, ऑनलाइन जेवायला मिळतंय का फुकटात बघा जरा.’ 
- असं उपरोधानं तरुण मुलांना येताजाता ऐकावं लागतं. पण तरुण मुलं काही हे सहजी मान्य करत नाहीत. 
उलट त्यांना असं वाटतं की, प्रत्यक्षात थेट संवाद नसला तरी काय झालं, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं काय चाललंय हे तर आपल्याला ऑनलाइनही कळतं. कुणी काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा पाळीव कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लगAाच्या वाढदिवसाला केलेल्या  खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून संपर्क असा वेगळा काय वाटतो?
तिथल्या तिथे ऑनलाइनच कुणाला वाढदिवसाला विश केलं काय नी कुणाला श्रद्धांजली वाहिली काय, आपला ना वेळ खर्च होतो, ना फार इमोशनल गुंता होतो, असं अनेकांचं मत आहे.
आता एका सव्रेक्षणानं त्यांच्या या मतावर शिक्कामोर्तब केलं आहे.  
या सव्रेक्षणाचं म्हणणं आहे की, वयाच्या पस्तिशीच्या आत असलेल्या अनेक तरुण मुलामुलींना आता प्रत्यक्ष सोशलायङिांगपेक्षा ‘ऑनलाइन सोशलायङिांगच’ जास्त कम्फर्टेबल अर्थात सोयीचं वाटतं.
म्हणजे काय तर मित्रमैत्रिणींनाही अनेकदा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा आणि कुठल्यातरी कट्टय़ावर पडीक राहण्यापेक्षा अनेकांना आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच भेटणं आणि तिथंच सामूहिक कल्ला करणं हे जास्त आनंददायी वाटतं!
अनेकजण तर असंही मत नोंदवतात की, आपण मित्रला प्रत्यक्ष भेटल्यावर फार कमी बोलणं होतं आता, ब:याच दिवसांनी भेटल्यावर तर काय बोलायचं हेच सुचत नाही इतकं आम्ही रोज आणि सतत बोलतच असतो.
आणि तेही आता शब्दानं, प्रत्यक्षात बोलावं लागत नाही. अनेक मुलामुलींचं तर प्रत्यक्ष फोनवर बोलण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्याऐवजी ते सतत लिहून बोलतात. सतत कीपॅडवर टुकटुक.
मात्र त्यातून एक गोष्ट घडली आहेच.
जी माणसं ऑनलाइन भेटत नाहीत, त्यांच्याशी बोलणंच बंद होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणजे काय तर मुंबई, बंगळुरू, दिल्ली, लखनौ या शहरांतल्या सव्र्हेत सहभागी झालेल्या बहुतांश तरुण मुलांनी मान्य केलंय की, आपल्या शेजारी कोण राहतं, त्यांचं नाव, त्यांच्या घरातली सुखदु:ख हे आपल्याला काहीही माहिती नसतं. येताजाता चेहरे ओळखीचे झाले तर हसतोबिसतो त्यांच्याकडे पाहून. पण तेवढंच. त्यापेक्षा जास्त ओळख आसपास नाही.
या सा:यामुळे आपणच आपल्या समाजापासून, प्रत्यक्ष संवादापासून तुटतोय का? असं विचारल्यावर मात्र संमिश्र मतं येतात. काहींना वाटतं असं काही नाही. ज्यांच्याशी संपर्कात राहायचं त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. तो वाढवतोही. मग बाकीचं सारंच माहिती पाहिजे असा आग्रह कशाला?
काहींना मात्र वाटतं की, वरवरच्या या टेक्निकल संवादामुळे अनेकदा नातं कोरडं होत जातं. पण तो आता या नव्या काळाचा भाग आहे.
अशी मतमतांतरे असताना एक गोष्ट या सव्रेक्षणात जाणवली की, ऑनलाइन सोशलाइज झाल्यानं कुणी आपल्या रंगावर, व्यंगावर, बोलण्यावर, भाषेवर टिप्पणी करत नाही असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे ते त्यांना सुखावतं!
एक नक्की, ‘सोशल’ असण्याच्या या काळात ‘ऑनलाइन सोशल’ ही एक नवीनच जमात तयार होत आहे.
ज्यांचे नियम प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळे आहेत आणि जगण्याच्या अपेक्षाही ते बदलून घेत आहेत.
 
 
65}
तरुण-तरुणी म्हणतात,
ऑनलाइन सोशल
असणंच जास्त
सोयीचं.
 
7क्}
तरुण-तरुणींना वाटतं की, 
मित्रमैत्रिणी, नातेवाईक 
यांच्याबद्दल सगळंच 
त्यांना ऑनलाइन कळतं!
- निशांत महाजन