शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Loss

By admin | Updated: September 25, 2014 17:14 IST

मीच का? माझ्याच वाट्याला का हे दु:ख यावं?असं म्हणत मन वेदनेनं भरुन निराश होतं तेव्हा..

- दु:ख आपल्याला बदलवतं, यावर विश्‍वास ठेवाल तुम्ही?
 
 
आपल्या सर्वांच्या जगण्यातली एक महत्त्वाची भावना. मृत्यू ही आपल्या जगण्यातली अटळ गोष्ट. मृत्यूला आपण का घाबरतो? कारण मृत्युमुळे आपण आपल्याला जवळची असणारी प्रिय व्यक्ती कायमची हरवून बसतो. अशा पद्धतीने काही गमावून बसण्याचा अनुभव खूपच दाहक असतो. आपलं अत्यंत जीवाभावाचं, अत्यंत प्यारं असं आपण काहीतरी गमावून बसतो, तो अनुभव तमा कुणासाठीच साधा नसतो. त्या अनुभवाला सामोरं जाताना जाणवणारी भावना म्हणजे दु:ख.
मात्र असं गमावून बसणं, सर्वस्व हरवणं हे काही फक्त कुणाच्या निधनामुळेच वाट्याला येतं असं नाही. मरणाहून भयंकर दु:ख अनेकदा जीवंतपणी भोगावं लागतं असं म्हणतातच ना !
घटस्फोट, नोकरी जाणं, शिक्षणात वर्ष वाया जाणं, मैत्री तुटणं, गर्भपात होणं, स्वप्नभंग होणं, पाळीव प्राण्याचा मृत्यू, आजारपणामुळे निरोगी आयुष्य गमावून बसणे, आर्थिक नुकसान, घर विकावं लागणं, आघातामुळे सुरक्षितता अथवा विश्‍वास गमावून बसणं, जवळच्या व्यक्तीचं आजारपण अशा अनेक घटनांमुळे आपल्याला प्रचंड दु:ख होतं. 
 या गोष्टींमुळे खूप दु:ख होतं असं आपण दाखवू शकू अशा काही कॉँक्रीट गोष्टी असतात, ज्या सांगता, दाखवता येतात, त्यांना स्पर्श करता येतो. काही मात्र अत्यंत अँबस्ट्रॅक्ट असतात. म्हणजे नात्यातला ट्रस्टच हरवला, एकदम इनसिक्युअर वाटू लागलं तरी दु:ख होतं, पण ते दाखवता येत नाही.
पण माणसाला दु:ख होतं म्हणजे काय?
कोणत्याही कारणाने जेव्हा दु:ख होतं तेव्हा मनाची एक खूप मोठी प्रक्रिया होत असते. कारण ते दु:ख अनुभवल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा स्वत:कडे, जगाकडे, इतर माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो.
तुम्ही आठवून पहा तुमच्या आयुष्यातले काही ‘गमावून’ बसण्याचे प्रसंग. परीक्षेत नापास झाल्यानं वर्ष वाया गेलं, ब्रेकप झाला, जवळची व्यक्ती कायमची सोडून गेली, तेव्हा आपण कसे होतो. त्या दु:खानंतर आपण कसे झालो? आपल्यात काय बदल घडले? असा विचार केला तर तुम्हालाही तुमच्यात झालेले काही बदल निश्‍चित जाणवतील. 
थोडक्यात कोणत्याही ‘लॉस’ला मन देतं ती  स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे दु:ख. ते  तुम्हाला आतून बदलायला, स्वत:ला तपासायला भाग पाडतं. दु:खाने माणसं अंर्तमुख होतात. समाजापासून काही काळासाठी विलग होतात. कारण दु:खाच्या त्या फेजमधून जाताना आपण काय गमावलं याची स्वत:च्या नकळत आपण गोळाबेरीज करतच असतो. 
 या ‘लॉस’ला आपण सामोरे कसे जाणार आहोत याची तयारी करू लागतात. कोलमडलेल्या मनाची पूर्णबांधणी करतात. म्हणूनच दु:ख ही भावना तशी वेदनाकारक असली तरी झालेल्या घटनेला सामावून घेत, आपलं जगणं पुन्हा नव्यानं सुरु करायला हीच भावना मदत करते.
- संज्योत देशपांडे