शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जाच आणि काच

By admin | Updated: February 25, 2016 21:47 IST

हुंड्याचा ताण मुलींनाच येतो असं नाही, तर मुलांनाही येतो. मुलगे म्हणतात, आम्ही कात्रीत अडकलोय, रीत सुटत नाही, घरचे ऐकत नाहीत आणि तसंही आमचं काही चालत नाही

 हुंड्याचा ताण मुलींनाच येतो असं नाही, तर मुलांनाही येतो. मुलगे म्हणतात, आम्ही कात्रीत अडकलोय, रीत सुटत नाही, घरचे ऐकत नाहीत आणि तसंही आमचं काही चालत नाही. .. आणि तसंही मुलींचे बापच तयार असतील, तर काय गैर आहे? प्रश्न अगदी साधा.. एरवी स्वतंत्र, बेदरकार, आपलं तेच खरं करणारी मुलं हुंडा घेताना घरच्यांच्या मागे का लपतात? तेव्हा का ‘नाही’ म्हणण्याचं बळ एकवटू शकत नाहीत? या प्रश्नाचा ‘त्रास’ बहुसंख्य मुलांना झाला हे आलेल्या तमाम पत्रातलं वास्तव. दुखऱ्या नसेवर कचकन पाय पडावा आणि वेदनेने तडफड व्हावी असं अनेक मुलांनी कळवळून लिहिलं! बहुसंख्य मुलांचं म्हणणं की, ‘एवढं सोपं नसतं, घरच्यांच्या विरोधात जाणं, त्यांनी ठरवलेल्या स्थळाला नाही म्हणणं, आणि हो म्हटलंच तरी हुंड्याला नाही म्हणणं! लगेच घरात इमोशनल धारावाहिक सुरू होतं. ‘आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं, लग्नाआधीच तू बायकोचा होणार, नंतर तर आम्हाला लाथच मारशील..’ असा तोंडाचा पट्टा सुरू होतो. उपाशी राहणं, रडणं-पिडणं असतंच. समाजातले चार मोठे लोक आणले जातात समजुतीसाठी! हा एवढा वैताग करण्यापेक्षा आपल्याला मुलगी पसंत असली तर म्हणायचं आता करा, तुम्हाला काय करायचं ते!’ मुद्दा काय, ‘घरच्यांसमोर आपलं चालत नाही’ हे अनेक मुलं मान्य करतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा वरकरणी लिहिणं टाळलेला पण वळसे घेऊन घेऊन तेच सांगितलेला आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे अनेक मुलांना अजूनही असंच वाटतं की, थोडाबहूत हुंडा घेणं, टोलेजंग लग्न मुलीकडच्यांनी करून देणं यात काही गैर नाही. हुंडा दिला नाही तरी थाटामाटात लग्न लावून देण्याची जबाबदारी तरी मुलीच्याच वडिलांची. त्यातून त्यांना कन्यादानाचं पुण्य मिळतं! हे सगळं जुनाट आहे हे मान्य करणारे पण हळूच सांगतात की, रीत आहे आपल्याकडची. एकदम कशी तुटेल. हळूहळू तुटेल. आम्ही नाही का बहिणींच्या लग्नात शेती विकून, कर्ज काढून हुंडा दिला, त्याला नाइलाज असतो. आणि मग त्या नाइलाजाच्या कहाण्याही वाचायला मिळतात. अनेक मुलांनी लिहिलं आहे की, तीन तीन बहिणींच्या लग्नात हुंडा दिला आहे. डोक्यावर दहा लाखांपर्यंतचं कर्ज. वडिलांना हातभार लावतोय. स्वत:चं लग्न लावण्याइतपत पैसा नाही हाताशी. कुठं काय बोलू? होऊ द्यायचं जे होतं ते.. त्यात अनेकांना नोकरी नसते. असली तर ती टेम्पररी. ही तात्पुरती नोकरी अनेकांची मजबुरी दिसते. एकतर आधीच नोकऱ्या मिळत नाहीत. शहरात मिळालीच नोकरी तरी मुलगी चटकन कुणी देत नाही. आणि दिलीच तर मग ही तात्पुरती नोकरी अडचण ठरते. मग मुलीकडचेही पर्मनण्ट होण्यासाठी (द्यावी लागणारी लाच म्हणून) पैसे देतात किंवा घरचे मागतात. मुलं यासाऱ्यासमोर मान तुकवतात. या अशा अनेक गोष्टी. एकीकडे लग्न जमत नाही. काहींना शहरात नोकरी नाही म्हणून कुणी मुलगी देत नाही. कुणाच्या डोक्यावर कर्ज, कुणाला जातीपातीचे काच, समाजाचं प्रेशर, आपल्या वागण्यानं लग्न करून गेलेल्या बहिणींच्या संसारांवर होणारे परिणाम यासगळ्याची गणितं या पत्रांत वाचायला मिळतात. वरकरणी हुंड्याचं समर्थन कुणीच करत नाही, पण आपण हुंडा का घेतला किंवा का घ्यावा लागतो, याची उत्तरं तर देतातच. आणि त्याच उत्तरात एक सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे, मुलीकडच्यांची प्रतिष्ठा! आपल्या मुलीला भरभरून देण्याची पालकांची तयारी असते. आणि त्या साऱ्याला नको म्हणणाऱ्यांना ते मुलगीच देत नाही. उलट मुलात दोष आहे म्हणत बदनामी करतात. हे सारं सांगताना अनेक तरुणांनी आपले अनुभव लिहिले आहेत. खेड्यापाड्यात, छोट्या शहरात राहणाऱ्यांनी तर समाज, जात, भाऊबंद, सोयरे या साऱ्यांनी आपलं जगणं कसं वेढून ठेवलं आहे आणि त्याचा जाच आणि काच किती पक्का आहे, याच्या कहाण्याही सांगितल्या आहेत. आणि त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत हे नक्की! त्यामुळे जे पारंपरिक पद्धतीनं हुंडा घेऊन, दणक्यात लग्न लावून घ्यायला तयार आहेत, त्यांचं सोपं आहे. त्यांना ना कसला दोष वाटतो, ना त्यातून काही अपराधगंध येतो. पण जी मुलं विचार करतात, त्यांना मात्र आपण कात्रीत सापडलो आहोत, असं वाटून गुदमरायला होतं आहे. आणि हे गुदमरणं मोठं आहे, असं ही पत्रं नक्की सांगतात. मुलग्यांचा नाइलाज होतो, कारण... १) मुलीकडचेच बळजबरी हुंडा देतात, हुंडा घेतला नाही तर बदनामी अटळ. २) घरचे इमोशनली ब्लॅकमेल करतात. ३) बहिणींच्या लग्नात हुंडा मोजलेला असतो, म्हणून नाइलाजानं स्वत:च्या लग्नात हुंडा घ्यावा लागतो. ४) हुंडा हा समाज, जातीत, भाऊबंदकीत प्रतिष्ठेचा विषय असतो. हुंडा घेतला नाही तर आपलं नाणं खोटं अशी समाजात चर्चा होते.नाही म्हणणारे आवाज परिस्थितीच्या कचाट्यात सापडून किंवा परंपरेत रुतून काहीजण हुंडा घेत आहेत, आणि काही प्रतिष्ठेचा भाग म्हणूनही आपली बोली लावत आहेत, हे वास्तव तर आहेच. पण या साऱ्यात आशेची काही किरणंही आहेत. पत्रांच्या गठ्ठ्यात खेड्यापाड्यातून आलेली काही अशीही पत्रं सापडतात जी म्हणतात, ‘आम्ही नाही घेणार हुंडा. नाहीच मुलीच्या वडिलांसमोर हात पसरणार. साधेपणानं लग्न करू. इतरांनाही समजावू.’ या पत्रांची संख्या कमी असली तरी तशी पत्रं आहेत हीच एक मोठी आशेची गोष्ट आहे. ( हुंडा नको असं म्हणणारी त्यातली निवडक पत्रं पान ६ वर वाचता येतील) मात्र हुंडा घेऊ नये असं वाटणाऱ्या सगळ्याच तरुण मुलांना असा ठोस निर्णय नाही करता येत. त्यातले बहुसंख्य आपल्या मनासारखं करायचं की घरच्यांचं ऐकायचं या कात्रीत सापडलेले दिसतात. पण हे काय कमी आहे की, निदान हुंडा घ्यावा की नाही, इतपत प्रश्न तरी आता अनेक मनं कुरतडू लागला आहे. ज्यांना असा प्रश्नच पडत नाही आणि आपली पाच आकडी नोकरी ही आपल्या हुंड्याची मोठी किल्ली आहे, असं वाटणाऱ्यांचा वर्ग वेगळा आहे. आणि दुर्दैवानं तो वाढतो आहे. मात्र कमी शिकलेली किंवा जेमतेम ग्रॅज्युएट मुलं, खेड्यापाड्यात वेगळा विचार करताहेत, हा विरोधाभास सुखकारक म्हणावा असा आहे! मुलीच म्हणतात, करा ना आमच्यासाठी खर्च! मुलाकडचे हुंडा मागतातच. पण मुली? त्यांनाही वडिलांकडून शक्य तितकं सारं हवं आहे. टोलेजंग लग्न, दागिने, सगळा संसार, ब्यूटिपार्लरमध्ये जाऊन उत्तम मेकअप आणि जमल्यास चांगलं हनिमून डेस्टिनेशन बुकिंगही. अनेकींना वाटतं की, वडिलांनी हे सारं आपल्यासाठी करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. काही जरा कमी पडतं आहे असं वाटलं तरी आकांडतांडव करणाऱ्या मुली आहेतच. मुलं म्हणतात, ‘मुलींनाच जर सगळं हवं आहे, तर आम्ही नाही म्हणणारे कोण? त्या मागतात, त्यांचे आई-वडील देतात. तो त्यांच्या खुशीचा मामला आहे.’ काहीजण तर असंही लिहितात की, मुलींना वाटतं की, वडिलांच्या इस्टेटीत आपलाही वाटा आहे. तो पुढे मिळेल न मिळेल. लग्नात जेवढं जमेल तेवढं मिळवलेलं बरं. तेव्हा वडील नाही म्हणत नाहीत. ‘हावऱ्या’ जर मुलीच होत असतील तर हुंड्याची सक्ती मुलं करतात? असा प्रश्न कसा विचारतात, असा सवालही अनेक पत्रांमध्ये दिसतो.