शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन

By admin | Updated: December 11, 2015 14:12 IST

कच:यावर उत्तरं शोधणा:या एका दोस्ताचा प्रवास.

 

मी दोन वर्षापूर्वी मुंबईच्या प्रख्यात ओडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. केमिकल इंजिनिअर झालो. लगेच नोकरीही मिळाली. पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीत, देशातल्या सगळ्यात मोठय़ा नामांकित कंपनीत मी सुरतला नोकरीलाही लागलो. तिथं प्लास्टिक तयार करण्याचं, पॉलिमर बनवण्याचं काम चालायचं. त्या कंपनीत तासाला साधारण 35क् टन प्लास्टिक तयार व्हायचं. प्लास्टिकचं उत्पादन, त्याचा वापर यासह विविध पैलूंचा मी अभ्यास करतच होतो.
आणि मला प्रश्न पडला की, ज्या प्लास्टिकचं एवढं प्रचंड उत्पादन होतं ते पुढं जातं कुठं? कारण ही एक कंपनी एका तासाला जर एवढं उत्पादन करत असेल तर अशा कितीतरी कंपन्या आहेत, कितीतरी प्लाण्ट्स आहेत तिथं किती उत्पादन होत असेल? 
अभ्यास करताना जाणवलं की हे प्लास्टिक लाइफसायकल संपल्यावर रिसायकल व्हायला जातंही, पण त्यासाठी होणारे  प्रयत्न कमी आहेत. उत्पादन, वापर आणि व्यवस्थापन यातली तफावत मोठी आहे. 
हे सारं चक्र माङया डोक्यात सुरूच होतं. त्याच काळात मी ‘निर्माण’च्या शिबिराला गेलो होतो. शाश्वत विकासाविषयी थोडीफार माहिती मला त्याकाळात झाली.
ते शिबिर संपवून मी सुरतला परत गेलो. मात्र माङया मनातले प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हते. सुरतला पोहचल्यावर मी छोटेमोठे प्रयत्न करतच होतो. प्लास्टिक जमा करून आम्ही ते रिसायकलिंगला पाठवलं. तापी नदीसाठी एक क्लिनअप प्रोजेक्टही केला. मी लोकांशी बोलत होतो, प्लास्टिक वापर आणि व्यवस्थापन याविषयी माहिती देत होतो. पण ते सगळे छोटे छोटे प्रयत्न होते. माङयापुरते होते.
काही दिवसांनतर मी जव्हार येथील ‘बायफ’ या संस्थेला भेट दिली. त्यावेळेस माङयासमोर कृषिकच:याचा प्रश्नही आला. 
मी कायम शहरात राहिलो होतो, कच:याचा प्रश्न फक्त शहरातला आहे, असंच मला वाटायचं. पण पहिल्यांदा मला कळलं की कच:याचा हा प्रश्न ग्रामीण भागातही आहे. 
कच:याच्या या प्रश्नानं मला झपाटलं होतं.
एक केमिकल इंजिनिअर म्हणून याप्रश्नी मी काही तोडगा शोधू शकतो का, असा मी विचार करत होतो. अभ्यास करत होतो.
याच काळात माझी मुंबई आयआयटीतल्या प्रा. संजय महाजनींशी भेट झाली. टाटा सेंण्टर फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन या संस्थेत काही प्रकल्प सुरू होणार होता. कच:यातूनच काही ऊर्जानिर्मिती करता येईल का या विषयावर माझं विचारचक्र सुरू असतानाच या उपक्रमाशी संपर्क आला. टाटा ट्रस्ट आणि आयआयटी यांच्या संयुक्त माध्यमानं कच:यापासून इंधननिर्मिती, तसेच स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी याबद्दल एक कार्यक्रम आखला गेला. या विषयात मला रस असल्यानं मी ‘कार्पोरेट’मधली नोकरी सोडली आणि तिथं रुजू होण्याचा निर्णय घेतला.
साधारण कॉलेज ते कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन आणि त्याचा सुयोग्य वापर या टप्प्यातून प्रवास करत मी एका नवीन कामाला नव्या ऊर्जेनं सुरुवात केली.
शहरात तयार होणा:या कच:याचे योग्य असे वर्गीकरण करून त्यातल्या कोणत्या भागाचे रूपांतरण वायू स्वरूपातील इंधनात करता येईल, ग्रामीण भागातील शेतमालाचा वापर झाल्यानंतर उरणारा कचरा जाळून न टाकता त्यापासून ऊर्जानिर्मिती करून विजेची गरज कशी भागवता येईल याचा शोध घेणं, कच:यापासून बनणारं इंधन वापरून धूर न येणारी चूल तयार करणं असं सध्या आमचं काम सुरू आहे.
मात्र हे सारं करताना माङया लक्षात काही गोष्टी येताहेत. कचरा हा काही एकाच जागी नसतो, तो पसरलेला आहे. आणि तो सर्वत्र एकसारखाही नाही. वर्गीकरण करायला गेलं तर त्यातही अनेक प्रकार दिसतात. म्हणजे सगळ्या कच:यावर सरसकट एकच तोडगा असं होत नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कचरा म्हणायचं कशाला? तर अशी गोष्ट जिचा वापर करून संपलेला आहे, त्याचा काही उपयोग उरलेला नाही अशी गोष्ट. 
अशा कच:याचं स्वरूप मोठं आहे आणि त्यामानानं आपले प्रयत्न तोकडे आहेत. कारण आपल्याकडचे मूलभूत प्रश्नच अजून सुटलेले नाहीत. पाणी, वीज हे प्रश्न आधी, कच:याची विल्हेवाट हा प्रश्न प्राधान्यक्रमात सगळ्यात शेवटी येतो. त्यामुळे या विषयातले संशोधनही तुलनेनं मागेच आहे. आणि सोल्यूशन सापडणं, ते वापरून पाहणं हेदेखील तुलनेनं कमी आहे.
त्यामुळे मला वाटतं की, मी एक केमिकल इंजिनिअर म्हणून असं काही काम करावं की त्यातून कचरा-पुनर्वापर-इंधननिर्मिती याविषयी काही ठोस पर्याय देता यावा!
सध्या मी त्यासाठीच प्रयत्न करतो आहे!!
 
- विवेक  पाटील
vivek28patil@gmail.com