शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लाज आणणार नाही, विराट कोहलीचं आश्वासन

By admin | Updated: March 3, 2017 14:11 IST

आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरोधात पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवाने भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीला खूप काही शिकवलं आहे. आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे खेळलो तसं खेळप्रदर्शन पुन्हा करणार नाही असा आश्वासन कोहलीने चाहत्यांना दिलं आहे.
 
गेल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवावर बोलताना कोहली बोलला की, 'अशा प्रकारच्या पराभवाला तुम्ही नक्कीच विसरणं पसंद कराल. जेव्हा एखादा निकाल आपल्याबाजूने नसतो, तेव्हा झालेला पराभव तुमच्या जिव्हारी लागणं फार महत्वाचं असतं. त्या पराभवातून तुम्ही शिकणं महत्वाचं असतं. जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुम्ही कधीच काही शिकू शकणार नाही'. 'आपल्या कमतरतेमुळे आपला पराभव झाला हे मान्य करणं महत्वाचं असतं. विरोधी संघ आपल्यापेक्षा चांगला खेळला हे मान्य करणंही तितकंच महत्वाचं आहे', असंही विराट कोहलीने सांगितलं आहे.
 
पुढे बोलताना कोहली म्हणाला की, 'याचा अर्थ आम्ही प्रत्येक कसोटी सामना अशाचप्रकारे खेळू असा होत नाही. जर तुम्ही प्रत्येक दिवस, सत्रात चांगला खेळलात तर कसोटी सामना जिंकता, जे आम्ही नाही करु शकलो. जे आम्हाला माहित आहे त्यावर भर देत सुधरवण्याचा प्रयत्न करु. मालिका संपेपर्यंत पुन्हा असं प्रदर्शन पाहायला मिळणार नाही याचं आश्वासन मी तुम्हाला देऊ शकतो'.
 
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 333 धावांनी दारुण पराभव केला आहे. गेल्या दोन वर्षातील हा अत्यंत खराब खेळ होता हे स्वत: कोहलीने मान्य केलं होतं. पहिला सामना हरल्याने भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेत पुनरागमन करणं भारतासाठी सोपी गोष्ट नाही, कारण 1932 मध्ये कसोटी खेळण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यत फक्त तीन वेळाच भारतीय संघ पहिला सामना हरल्यानंतर मालिकेत यशस्वी कामगिरी करण्यास यशस्वी झाला आहे.