शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडिया सध्या अडचणीत

By admin | Updated: October 28, 2015 22:27 IST

भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट आॅल स्टार्स मालिकेसाठी सचिनने मुंबईत कसून सराव केला. यानंतर त्याने टीम इंडियाविषयीचे मत व्यक्त केले.
सचिन म्हणाला की, सध्याचा आपला संघ उत्तमच आहे. मात्र प्रत्येक संघाला कधीना कधी अशा अडचणीच्या काळातून जावेच लागते. शिवाय खेळामध्ये जय- पराजय होत राहतात. अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात. टीकाकारांनीही संघाच्या पराभवानंतर आपला निर्णय देऊ नये. क्रिकेटविषयी आपण खुप जोश राखून असतो. मात्र त्याचबरोबर थोडा संयम देखील बाळगावा.’
एकदिवसीय मालिका गमविल्यानंतर टीम इंडियावर फलंदाजी क्रमावरून कठोर टीका झाली. मात्र सचिनने यावर प्रतिक्रीया देण्यास नकार देत, मी संघाचा भाग नसल्याने काही माहिती नसताना मत मांडणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले.
विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ प्रशिक्षकाविना खेळत असून टीम इंडियाचा प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी या प्रश्नावर सचिन म्हणाला की, प्रशिक्षक कुणीही असो टीम इंडियाला यावरून फरक पडत नाही. परंतु तो प्रशिक्षक सक्षम असावा असे स्पष्ट मत सचिनने मांडले. (वृत्तसंस्था)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बदललेल्या नियमांबाबत सचिन म्हणाला की, बदललेल्या नियमांमुळे खूप मोठा परिणाम किंवा बदल झाला आहे. ज्यावेळी मी खेळत होतो तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार क्षेत्ररक्षकांचा नियम होता. परंतु आज एकदिवसीयचे जवळपास सर्वच नियम बदलले आहेत. केवळ चार क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर ठेवू शकत असल्याने गोलंदाजांवर मोठे दडपण आलेले असते.
आयसीसीसीने बदललेल्या नियमांमुळे फलंदाजांना खूप मोठा फायदा मिळत असून ते एकदिवसीय सामन्यात विशाल धावसंख्या उभारताना दिसतात. ज्या फटक्यांचा कधी विचारही केला जाऊ शकत नव्हता असे फटके आज टी-२० क्रिकेटमध्ये खेळले जात आहेत. यामुळेच संघाच्या धावसंख्येत खूप मोठी वाढ होत आहे.
- सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू