शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

रोस्टन चेसच्या झुंजार शतकाने भारताची विजयाची संधी हुकली

By admin | Updated: August 4, 2016 08:53 IST

सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

ऑनलाइन लोकमतकिंगस्टन, दि. ४- सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला. चौथ्या दिवशी चार बाद ४८ अशी वेस्ट इंडिजची अवस्था करणा-या भारतीय गोलंदाजांनी पाचव्यादिवशी साफ निराशा केली. 

नाबाद १३७ धावांची खेळी करणारा रोस्टन चेस भारताच्या विजयाच्या मार्गात अडथळा बनला. त्यात थोडी मदत पावसाने केली. मात्र त्यामुळे रोस्टने जो झुंजार बाणा दाखवला त्याचे महत्व कमी होत नाही. भारताच्या विजयाच्या मार्गात 'दीवार' बनलेल्या या कामगिरीसाठी रोस्टला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 
त्याला ब्लॅकवूड (६३), डाऊरीच (७४) आणि होल्डर (६४) यांनी महत्वपूर्ण साथ दिली. चेसने पाचव्या विकेटसाठी ब्लॅकवूड बरोबर ९३, सहाव्या विकेटसाठी डाऊरीच बरोबर १४४ आणि होल्डर बरोबर नाबाद १०३ धावांची भागीदारी करुन विंडिजचा पराभव टाळला. भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. 
 
खरतर भारत सहज हा सामना जिंकेल अशा स्थितीत होता. भारताला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९६ धावात रोखल्यानंतर भारताने ३०४ धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. 
 
चौथ्या दिवशी शामीच्य धडाक्यापुढे यजमानांनी पहिल्या सत्रात १५.५ षटकांतच चार बळी गमावल्याने सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर डावाच्या पराभवाचे संकट ओढवले होते. ईशांत शर्मा (१/१९) आणि अमित मिश्रा (१/२१) यांनीही अचूक मारा करताना विंडीजला दबावाखाली ठेवले.
 
पहिल्या डावात यजमानांनी १९६ धावा केल्यानंतर भारताने ९ बाद ५०० धावांवर पहिला डाव घोषित करून सामन्यात वर्चस्व मिळवले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अखेरचे सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशीही पावसामुळे एक तास उशिराने खेळ सुरू झाला. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका (१) तिसऱ्याच षटकात ईशांतचा शिकार ठरल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास खेळ थांबल्यानंतर ब्रेथवेट आणि ब्रावो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शमीने आखूड टप्प्याच्या चेंडूने ब्रावोला अडचणीत आणले.
 
१३व्या षटकात कर्णधार कोहलीने अमित मिश्राला गोलंदाजीला पाचारण केले. त्याने ब्रेथवेटचा बळी घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. यानंतर शमीने धोकादायक मार्लोन सॅम्युअल्स आणि ब्रावो यांना माघारी धाडून भारताचे वर्चस्व निर्माण केले होते.