शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून पाकचा धुव्वा

By admin | Updated: October 16, 2014 01:31 IST

कर्णधार अरमान कुरैशीसह (२ गोल) संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा ६-० असा धुव्वा उडविला़

जोहोर बाहरू : कर्णधार अरमान कुरैशीसह (२ गोल) संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा ६-० असा धुव्वा उडविला़ २१ वर्षांखालील गटात आयोजित स्पर्धेच्या गत सामन्यात ब्रिटनकडून ०-२ ने पराभूत झालेल्या भारतीय संघाने आज प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली आणि पाकवर एकतर्फी विजय मिळविला़ भारताकडून आरमान कुरैशी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना (४९ आणि ७० वा मिनीट) शानदार गोल नोंदविले़ तर इमरान खान याने २१ व्या मिनिटाला, परविंदर सिंहने ३४, हरमनप्रीत सिंह ५३ आणि वरुणकुमार याने ६७ व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल नोंदवीत संघाला थाटात विजय मिळवून दिला़भारताचा जोहोर चषक स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला आहे़ यापूर्वी भारताने न्यूझीलंडला पहिल्या लढतीत २-१ ने धूळ चारताना स्पर्धेत आगेकूच केली होती़ मात्र, दुसऱ्या लढतीत भारतावर ब्रिटनकडून ०-२ अशा फरकाने पराभवाची नामुष्की ओढावली होती़ स्पर्धेत आता भारतीय संघाचा पुढचा सामना गुरुवारी मलेशियाविरुद्ध होणार आहे़ पाकविरुद्धच्या लढतीत भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ सुरू केला़ भारताने फॉरवर्ड गोल करण्यासाठी आतुर असल्याचे दिसले़ त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव स्पष्टपणे दिसत होता़ टीम इंडियाने याचा लाभ घेतला़ सामन्याच्या २१ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर इमरान खान याने पहिला गोल नोंदवीत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली़ पाकिस्तानचा गोलकिपर मोहंमद खालीद याने पहिल्यांदा फ्लिकचा बचाव केला होता़ मात्र, इमरानच्या रिबाऊंडचे त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते़ परविंदरने पहिला हाफ संपायला अवघा १ मिनीट शिल्लक असताना गुरिंदर सिंहच्या अचूक पासवर शानदार गोल नोंदवून संघाची आघाडी २-० अशी करू न दिली़सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला़ मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही़ गोलकीपर अभिनव पांडे याने जबरदस्त खेळ करीत पाकचे अनेक हल्ले परतवून लावले़ दरम्यान, अरमान कुरैशीने ४९ व्या मिनिटाला नोंदवीत भारताची आघाडी ३-० अशी केली़ याच्या चार मिनिटानंतर हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर शानदार गोलमध्ये केले़ ६७ व्या मिनिटाला भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाले़ त्यावर वरुणने अप्रतिम गोल नोंदविला़ अरमान कुरैशी याने सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना गोल नोंदवून भारताचा मोठा विजय सुनिश्चित केला़ (वृत्तसंस्था)