शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांचा ‘लेटर’ बाऊन्सर

By admin | Updated: October 30, 2015 22:33 IST

टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती वानखेडे स्टेडियमचे क्यूरेटर सुधीर नाईक यांनी बीसीसीआयला पत्राद्वारे केली आहे

मुंबई : टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती वानखेडे स्टेडियमचे क्यूरेटर सुधीर नाईक यांनी बीसीसीआयला पत्राद्वारे केली आहे. सूत्रानुसार भारतीय संघ व्यवस्थापनाला चेंडू वळण घेणारी खेळपट्टी हवी होती. क्यूरेटर यांना हे निर्देश सामन्याच्या दोन दिवस आधी मिळाले. नाईक यांनी पत्रात लिहिले, ‘सामन्याचे आयोजन असेल तर बीसीसीआय किमान १२ दिवस आधी खेळपट्टीबाबत सूचना देते. यंदा काहीच सूचना आल्या नव्हत्या. आम्ही फलंदाजांना पूरक खेळपट्टी बनविली. सामन्याच्या दोन दिवस आधी वळण घेणाऱ्या खेळपट्टी बनविण्याची सूचना मिळाली. विकेट आधीच तयार झाली असल्याने ऐनवेळी जे काही करता आले ते केले. त्यात खेळपट्टीवर पाणी न टाकणे, गवत काढणे आणि रोलिंग न करणे आदी बाबींचा समावेश आहे.’संघ व्यवस्थापनाने केवळ गुड लेंग्थ एरियापर्यंत पाणी देण्यास सांगितले होते. क्यूरेटर या नात्याने मला हे अयोग्य वाटले. यामुळे खेळपट्टी दोन रंगांची दिसते. याशिवाय प्रसन्ना यांनी देखील पाणी न टाकण्याचा सल्ला दिला होता. पहिला डाव आटोपताच रवी शास्त्री मला म्हणाला, ‘चांगले काम केले सुधीर! फारच छान खेळपट्टी आहे. यावर मी थँक्स म्हटले. नंतर लगेच त्यांनी मला शिव्या हासडल्या आणि ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले. माझे सहायक रमेश महामुंकर यांच्यावर अरुण यांनी पीचवर पाणी टाकण्यासाठी दडपण आणल्यामुळे त्यांचीही तक्रार केली आहे. अरुण यांनी रमेशला शिव्या दिल्या. काल रात्रीपासून तुला सांगत आहोत पण माझे तू एकले नाहीस. असेही दरडावून सुनावले.’ (वृत्तसंस्था)मोहाली : भारत-द. आफ्रिका यांच्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेची सुरुवात मोहालीच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून होईल. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान आणि नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असल्याने मोहालीची खेळपट्टी कसोटीअनुरूप असल्याचे मत पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव एम.पी. पांडोव यांनी व्यक्त केले आहे.आम्ही चांगली खेळपट्टी तयार केली असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. फलंदाज असो की गोलंदाज सर्वांना समान संधी असेल. या खेळपट्टीवर सरुवातीला वेगवान मारा प्रभावी ठरेल. नंतर खेळपट्टीला भेगा गेल्या की फिरकी मारा सरस ठरेल. आऊटफिल्ड हिरवेगार असल्याने पाच दिवसाच्या सामन्यासाठी ही खेळपट्टी उपयुक्त ठरावी.’टी-२० आणि वन डे मालिका गमविणारा भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित पहिली कसोटी जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. द. आफ्रिका संघाचे १ नोव्हेंबर रोजी येथे आगमन होत आहे. भारतीय संघ दिल्लीत हरभजनच्या स्रेहभोजनाला उपस्थित राहिल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी दाखल होईल. तिकीट विक्रीत कुठलाही उत्साह दिसत नाही. आतापर्यंत हजार तिकिटे विकली गेली. पांडोव यांनी कसोटी सामन्याच्या तिकीट विक्रीचे दर घटविण्यास सहमती दर्शविली. ते म्हणाले,‘अलिकडे कसोटी सामन्यांकडे प्रेक्षक पाठ फिरवित असल्याने तिकीटदर अत्यल्प असावे असे माझे मत आहे.’सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वाटतेपांडोव म्हणाले, ‘मोहाली मैदानावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची उत्कृष्ट व्यवस्था आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडला तरी दोन तासांत पुढील खेळ सुरू होऊ शकतो. हिवाळा सुरू होण्याआधी पावसाने येथे हजेरी लावली आहे. हवामानामुळे सामन्यात व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत.’ वन डे आणि टी-२० सामन्यांदरम्यान प्रेक्षकांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर येथे कडक उपाययोजना असेल. प्रेक्षकांना बाहेरून काहीही घेऊन जाण्याची परवानगी नाही. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि सचिव अनुराग ठाकूर मोहालीत येणार आहेत. याशिवाय सर्व निवडकर्ते सामन्यादरम्यान हजेरी लावणार असल्याची माहिती पांडोव यांनी दिली. अरुण कोण आहे आणि कुठल्या नात्याने त्याने माझ्या सहायकावर दडपण आणले हे मी संघ व्यवस्थापनाला विचारू इच्छितो. अरुणचे काम गोलंदाजांना कोचिंग देण्याचे आहे. शास्त्रीने मला देखील शिव्यांची लाखोळी वाहिली. या प्रकाराबद्दल दोघांनाही शिक्षा व्हावी. - सुधीर नाईक