शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफिजूरने गुंडाळले , भारत सर्वबाद २००

By admin | Updated: June 21, 2015 20:23 IST

बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने भारताचा डाव अवघ्या २०० धावांवर आटोपला.

ऑनलाइन लोकमत

मीरपूर, दि. २१ - बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने भारताचा डाव अवघ्या २०० धावांवर आटोपला.   बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सलग दुस-या सामन्यात भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली.

मीरपूर येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाल्याने भारताची सुरुवात निराशाजनक झाली. यानंतर शिखर धवनने विराट कोहलीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विराट २३ धावांवर बाद झाला तर शिखर धवनने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली.  अंबाटी रायडूही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद ११० अशी झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या धोनीने सुरेश रैनाच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. रैना ३४ तर धोनी ४७ धावांवर बाद झाला.  अक्षर पटेल शून्यावर तर आर. अश्विन चार धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा १९  तर भुवनेश्वर कुमार दोन धावांवर बाद झाला. पावसामुळे सामना ४७ षटकांचा खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशसमोर विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य आहे. मुस्तफिजूर रहमानने १० षटकांत ४३ धावा देत सहा विकेट घेतल्या. तर रुबेल हुसेन व नासीर हुसेनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.