शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

By admin | Updated: January 1, 2017 01:09 IST

४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

राजकोट : ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उभय संघांनी उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडूने विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत कर्नाटकचा केवळ दोन दिवसांमध्ये पराभव केला तर मुंबईने रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादची झुंज ३० धावांनी मोडून काढली. मुंबई संघाला विजय मिळवताना पाचव्या व अखेरच्या दिवशी घाम गाळावा लागला होता.
नवे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकरच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या विजयामुळे तामिळनाडू संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. २८ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीचा मानकरी ठरलेल्या तामिळनाडू संघाने स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन व मुरली विजय यांच्याविना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लोकेश राहुल व करुण नायर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा पराभव केला. स्पर्धेतील चमकदार कामगिरी बघता मुंबई संघाला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, पण त्यांना तामिळनाडू रोखण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. उभय संघांदरम्यान आॅक्टोबर महिन्यात साखळी फेरीत लढत झाली होती. त्यात मुंबई संघाने लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत तीन दिवसांमध्ये दोन विकेटने विजय मिळवला होता. आॅक्टोबरनंतर मुंबई संघात बराच बदल झाला आहे. लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत धवल कुलकर्णीने १० बळी घेतले होते, पण आता त्याचा अखिल हेरवाडकर व शुभम रांजणे यांच्यासह दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)