शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पुरस्कार प्रेरणा देतात, ते अंतिम ध्येय नाही : मनू भाकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 10:37 IST

'खेलरत्न'साठी डावलले: ऑलिम्पिक पदक विजेत्या नेमबाजाने व्यक्त केला संताप

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद 'खेलरत्न'साठी हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा खेळाडू प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या पुरस्कारासाठी २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरचे नाव नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

मनूचे वडील राम किशन यांनी तर संताप व्यक्त करताना 'मुलीला नेमबाज का बनवले,' असा सवाल स्वतःला केला. त्यानंतर राजकारणही तापले. यावर स्वतः मनूने मौन सोडले. मनू म्हणाली, 'क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'खेलरत्न'साठी माझ्या नामांकनावरून सुरू झालेल्या वादासंदर्भात मी हे सांगू इच्छिते की, एक खेळाडू म्हणून माझे कर्तव्य माझ्या देशासाठी खेळणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे हे आहे. पुरस्कार आणि सन्मान हे प्रेरणा देतात, पण ते माझे अंतिम ध्येय नाही.

क्रीडा मंत्रालयाची बाजू

क्रीडा मंत्रालयानुसार ही केवळ शिफारस आहे, अंतिम निर्णय झालेला नाही. 'मनूने सांगितले की तिने पोर्टलवर अर्ज केला आहे. असे असेल, तर समितीने तिच्या नावाचा विचार करायला हवा. महासंघाने क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करायला हवी. तिचे नाव पुरस्काराच्या यादीत समावेश करून घेण्याची विनंती करायला हवी,' असे सूत्राने सांगितले.

अर्ज करताना माझ्याकडून चूक झाली असावी असे मला वाटते. ती चूक दुरुस्त केली जात आहे. पुरस्काराची पर्वा न करता मी देशासाठी आणखी पदके जिंकण्यासाठी प्रेरणा घेत राहीन. सर्वांना विनंती करते की, या विषयावर अधिक तर्कवितर्क मांडू नका.

मनूला खेळाडू बनवायलाच नको होते?

एका मुलाखतीत मनू भाकरचे वडील रामकिशन यांनी क्रीडा मंत्रालय आणि समितीवर टीका केली. ते म्हणाले, मुलीला नेमबाज बनवले याची मला खंत वाटते. मी तिला क्रिकेटपटू बनवायला हवे होते. मग, पुरस्कार व सन्मान सहज मिळाला असता. एका ऑलिम्पिकमध्ये दोन दोन पदकं जिंकली, आणखी काय करायला हवे होते? सरकारने तिच्या कामगिरीची दखल घ्यायला हवी. ती प्रचंड निराश झाली. मला सांगितले की, 'मी ऑलिम्पिकमध्ये जाऊन देशासाठी पदके जिंकायला नको होती का? खरे तर मी खेळाडू बनायला नको होते?'

एनआरएआय, क्रीडा मंत्रालय जबाबदार

मनी भाकरचे प्रशिक्षक आणि माजी नेमबाज जसपाल राणा यांनी मनूकडे दुर्लक्ष केल्याबद्दल क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय रायफल महासंघाला दोष दिला. ते म्हणाले, 'सरकारी यंत्रणा म्हणते की मनूने अर्ज केला नाही. माझ्या मते तिला अर्ज करण्याची गरज नाही. तिचे नाव स्वतःहून पुढे यायला हवे. मनू कोण आहे, तिची कामगिरी काय, हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? चुकीचा पायंडा पडला की खेळाडूंचे मनोबल खच्ची होते. पुरस्कारासाठी खेळडूंकडून थेट अर्ज मागविणे खेळाच्या हिताचे नाही. कामगिरीची दखल घेत पुरस्कार देण्याची व्यवस्था व्हायला हवी. क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण किंवा राष्ट्रीय क्रीडा महासंघाने यात पुढाकार का घेऊ नये.' 

टॅग्स :Shootingगोळीबार