शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या टीकाकारांना कोहलीचे विराट उत्तर

By admin | Updated: July 7, 2017 22:15 IST

संथ फलंदाजीमुळे धोनीवर जोरदार टीका करण्यात आली होती. पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराटने धोनीची पाठराखण केली

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. 7 - सर्वोत्कृष्ट फिनिशर मानला जाणा-या धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वांत कूर्मगती खेळी केली. चौथ्या सामन्यात त्याने 114 चेंडूत केवळ 54 धावा केल्या पण 190 चे विजयी लक्ष्य गाठून देऊ शकला नव्हता. याच खेळीमुळे धोनीच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. संथ फलंदाजीमुळे धोनीवर जोरदार टीका करण्यात आली होती. पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराटने धोनीची पाठराखण केली. यावेळी धोनीच्या टीकाकारांना त्याने सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला धोनीनं कसं खेळावं हे कोणीही सांगायची गरज नाही.

आणखी वाचा Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी

 

धोनीच्या निवृत्तीच्या मागणीविषयी प्रश्न विचारताच कोहलीने धोनीचे समर्थन केले. यावर तो म्हणाला, परिस्थितीनुरुप खेळणे आणि धावसंख्येला आकार देणे हे अनुभवी खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. विकेट कशी आहे याकडेही लक्ष द्यावे लगेल. ती विकेट खेळण्यायोग्य नव्हतीच. एक सामना किंवा एक खेळी खराब झाल्यामुळे संयम सोडण्याची गरज नाही. कुठल्याही फलंदाजाला एखाद्या सामन्यात खराब फॉर्मचा सामना करावा लागू शकतो. धोनीबाबत कुठली समस्या आहे, असे मला वाटत नाही.

आणखी वाचा - सात वर्षात पहिल्यांदाच रहाणेनं केला हा पराक्रम

हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्यासारखे खेळाडू संघात असल्याबद्दल मी खूष असून हे फलंदाज तळाच्या स्थानावर आक्रमकता जोपासतात, असे कर्णधार विराट कोहलीचे मत आहे. अपेक्षा असताना कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत संघात फारसे काही बदल केले नाहीत. मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, तुम्ही कुठल्याही संघाला सोहजपणे घेऊ शकत नाहीत. हार्दिक आणि केदारसाख्यांना तुम्ही वरच्या स्थानावर तसेच आघाडीच्या फलंदाजांना तळाच्या स्थानावर खेळवू शकत नाही.

आणखी वाचा विराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांचा सन्मान राखावाच लागतो. खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे. हे ओळखून डावपेचांवर ठामपणे अंमल करण्याविषयी विचार केला पाहिजे.  हार्दिक आणि केदार यांच्यात आम्ही सर्व खेळाडू आत्मविश्वास जागविण्याचे काम करतो. त्यांच्या क्षमतेवर विश्वास असल्याने दोघेही प्रभावी कामगिरी करण्यास नेहमी सज्ज असतात, असे सांगून तो म्हणाला, नेहमी एकसारखे बाद होणे आपल्याला पसंत नाही. चुका सुधारणे तसेच कामगिरी करणे हेच माझ्या यशाचे गमक आहे.