शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटासाठी १५ तासांपूर्वीच लागली रांग

By admin | Updated: October 6, 2015 01:25 IST

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा फ्री पास मिळविण्यासाठी सरकारी बाबूंपासून पोलीस, मंत्री, राजकीय नेते व पत्रकार यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

- क्रिकेट पाससाठी फुकट्यांची फिल्डिंग

कानपूर : भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा फ्री पास मिळविण्यासाठी सरकारी बाबूंपासून पोलीस, मंत्री, राजकीय नेते व पत्रकार यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. पण, या विविध यंत्रणांकडून होत असलेल्या फुटक पासच्या मागणीमुळे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना मात्र हैराण झाली आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या ग्रीन पार्क मैदानावर पहिला एकदिवसीय सामना होत आहे. या विविध सरकारी यंत्रणांतील अधिकाऱ्यांकडून क्रिकेट संघटनेकडे या सामन्याच्या फ्री पासची मागणी केली जात आहे. इतकेच नाही तर जेवण, शीतपेय, चहा यांसाठीदेखील फ्री कूपनाची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने तर, आम्हाला प्रदेश मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना पास द्यायचे आहेत; त्यामुळे अधिक पास देण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचा एक अधिकारी म्हणाला, ‘‘जिल्हा प्रशासनाकडून आमच्याकडे तब्बल ६ हजार पास देण्याची मागणी करण्यात आली आहे. इतके पास देणे
आम्हाला शक्य नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळापासून उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटना यांना आम्हाला पास द्यावे लागतील.’’
तसेच, याशिवाय त्यांच्या भोजनाची व्यवस्थादेखील आम्हाला करावी लागेल. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच लाखो रुपये किमतीच्या व्हीआयपी बॉक्सवर आपला अधिकार राखून ठेवला आहे. असे असूनही त्यांच्याकडून मोफत पास मागितले जात आहेत. त्यामुळे आम्हाला असे पास देणे कठीण असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)

१५ तास आधीच रांगा..
-क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळावे, यासाठी ग्रीन पार्क मैदानाबाहेर विद्यार्थी गॅलरीसाठी चाहत्यांनी तिकीटविक्री सुरू होण्यापूर्वी १५ तास आधीच रांग लावली होती.
-सोमवारी सकाळी दहा वाजता तिकीटविक्री सुरू होणार होती. तब्बल एक हजार क्रिकेट चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली होती. तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर हा आकडा अडीच हजारांच्या वर गेला. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती.
-तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर उसळलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी हे वृत्त फेटाळले आहे. लाठीमार केला नसून, गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बळ वापरल्याचे एसएसपी शलभ माथूर यांनी सांगितले.