शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय

By admin | Updated: March 19, 2016 23:42 IST

टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.१९ -  टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 'विराट' विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना भारताचा फलंदाज विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुऴे भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने १५. ५ षटकात चार बाद ११९ धावा केल्या.  या सामन्यात फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक जास्त धावा कुटल्या. त्याने ३७ चेंडूत नाबाद एक षटकार आणि सात चौकार लगावत ५५ धावा केल्या. तर महेंद्र सिंह धोनीने नाबाद १३ धावा केल्या. विराट कोहली आणि युवराजच्या खेऴीमुऴे भारताने ९ षटकात ५० धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर गोलंदाज वहाब रियाजच्या गोलंदाजीवर युवराज सिंह २४ धावांवर झेलबाद झाला. त्याआधी भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला झटका बसला. रोहित शर्माला मोहम्मद आमिरने झेलबाद केले. तर, शिखर धवन सहा धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच सुरेश रैना अवघ्या शून्य धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद सामीने बाद केले. 
पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वात जास्त २६ धावा केल्या. तर शारजील खान (१७), अहमद शेहजाद(२५), उमर अकमल (२२), शाहिद आफ्रिदी आठ धावांवर बाद झाला आणि सरफराज अहमदने नाबाद आठ धावा व मोहम्मद हाफिजने नाबाद पाच धावा केल्या.
तसेच,  यासामन्यात गोलंदाज  बुमराह पांड्या, सुरेश रैना, नेहरा आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद सामीने दोन, तर वहाब रियाज आणि मोहम्मद आमिरने प्रत्येकी एक बऴी घेतला. 
या सामन्यात फलंदाज विराट कोहली सामनावीर ठरला.