शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

भारताची मदार फिरकीवर

By admin | Updated: November 5, 2015 02:35 IST

टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर उद्या (गुरुवार)पासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात फिरकीच्या जाळ्यात ओढून दक्षि

मोहाली : टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर उद्या (गुरुवार)पासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात फिरकीच्या जाळ्यात ओढून दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखविण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.या मालिकेत भारताला घरच्या खेळपट्ट्यांचा कुठलाही लाभ आतापर्यंत तरी झालेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या अनुपस्थितीत खेळेल. ईशांतला लंकेविरुद्ध केलेल्या वर्तनामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. भारताची मुख्य भिस्त फिरकीवरच राहील. रवींद्र जडेजाच्या पुनरागमनानंतर विराट तीन फिरकी गोलंदाजांसह उतरू शकतो. आॅफस्पिनर आर. आश्विनदेखील ‘फिट’ आहे. लंकेविरुद्धच्या मालिकेत २० बळी घेणारा आश्विन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरू शकतो. फलंदाजीत भारताकडे शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा तसेच रोहित शर्मा आहेत. द. आफ्रिकेची चिंता मात्र आमलाचा खराब फॉर्म हीच आहे. डिव्हिलियर्स, डीन एल्गर, स्टीव्हन वान झिल, फाफ डुप्लेसिस हे दमदार फलंदाज आहेत. ड्युमिनीची जागा घेणारा तेंबा वाबुमा हादेखील उपयुक्त ठरू शकतो. गोलंदाजीची जबाबदारी डेल स्टेन, मोर्नी मोर्केल हे वेगवान तसेच इम्रान ताहीर, सिमोन हार्पर आणि डेन पिट या फिरकी गोलंदाजावर असेल. (वृत्तसंस्था)हेड टू हेडभारत आणि द. आफ्रिका या दोन्ही संघांदरम्यान (१९९२-२०१३) आत्तापर्यंत एकूण २९ कसोटी सामने झाले आहेत. यात भारताने ७ तर द. आफ्रिकेने १३ सामन्यांमध्ये विजय नोंदविला आहे. ९ सामने अनिर्णित राहिले आहेत.मोहाली येथे हे दोन्ही संघ एकमेकांसमोर प्रथमच कसोटी खेळणार आहेत.भारताने द. आफ्रिकाविरुद्ध कोलकाता येथे ६ बाद (६४३) ही सर्वाेच्च धावसंख्या नोंदविली आहे.द. आफ्रिकेने सेन्चुरियन येथे ४ बाद ६२० (घोषित)ही सर्वाेच्च धावसंख्या नोंदविली.उभय संघभारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरोन.दक्षिण आफ्रिका : हाशीम आमला (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, तेंबा बावुमा, जेपी ड्युमिनी, फाफ डु प्लेसिस, डीन एल्गर, सिमोन हार्पर, इम्रान ताहीर, मोर्नी मोर्केल, व्हर्नोन फिलँडर, डेन पिट, कागिसो रबाडा, डेल स्टेन, स्टीव्हन वान झील, डेन विलास.स्थळ : पीसीए मैदान मोहाली सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्आश्विन ‘ट्रम्पकार्ड’ ‘‘कसोटीत फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरते. पाच फलंदाजांनी धावांची जबाबदारी स्वीकारावी तसेच चार गोलंदाजांनी सामना जिंकून देण्यासाठी मारा करावा, अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने आर. आश्विन ट्रम्पकार्ड ठरेल. मोहालीच्या खेळपट्टीवर आश्विन सामना जिंकून देऊ शकतो. गेल्या दोन -तीन वर्षांत भेदक मारा करून सामना जिंकून देण्याचा त्याला अनुभव आहे. खेळपट्टी कशी असावी, याची साधी चर्चादेखील होऊ नये. अनुकूल खेळपट्टी तयार करण्याचा यजमान संघाला अधिकार असतो. विदेशात आम्ही खेळपट्टीची कुठलीही तक्रार करीत नाही.’’- विराट कोहली, कर्णधार भारत.ओव्हर टू मोहाली...अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनी हा पहिल्या कसोटीत द. आफ्रिकेसाठी खेळणार नाही. तो तिसऱ्या वन डेदरम्यान जखमी झाला होता. त्याची जखम बरी होण्यास तीन आठवडे लागतील; त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्णधार हाशीम आमला याने पत्रकारांना दिली.खेळपट्टी मंद राहील - क्युरेटरपीसीएच्या खेळपट्टीबाबत कितीही कयास लावले जात असले, तरी क्युरेटर दलजितसिंग यांच्या मते ही खेळपट्टी जुनी असल्याने सामन्यादरम्यान मंद पडेल. या सामन्याचा निश्चितपणे निकाल लागेल. २३ वर्षे जुन्या असलेल्या या खेळपट्टीचा लाभ दोन्ही संघांना मिळणार आहे. येथे फिरकीला अधिक वाव असल्याचे दलजित यांचे मत आहे. तळाच्या फलंदाजांचा सरावपहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील तळाच्या फलंदाजांनी नेटमध्ये फलंदाजी केली. वरुण अ‍ॅरोन, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांनी फलंदाजीचा सराव केला. रवी शास्त्री यांच्यासह सहायक कोच संजय बांगर हे प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करीत होते. त्यानंतर आश्विन, अमित मिश्रा आणि जडेजा यांनी गोलंदाजीवरदेखील लक्ष केंद्रित केले. या तिन्ही फिरकी गोलंदाजांना अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळेल, अशी चर्चा आहे.जडेजासह ५ गोलंदाज असावेत - गावसकर नवी दिल्ली : कसोटी संघात चार गोलंदाज असावे की पाच यावर सातत्याने मतभेद होत असताना माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी मात्र रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्याचा सल्ला देत त्याच्या समावेशामुळे संघाला अष्टपैलू म्हणून पाचवा गोलंदाजही मिळेल असे सुचवले.