शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेट योग्य दिशेने पुढे जात आहे

By admin | Updated: October 10, 2015 01:09 IST

निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर महान फलंदाज सचिन तेंडुलरच्या मते, भारतीय क्रिकेट ‘योग्य दिशेने’ मार्गक्रमण करीत आहे; परंतु अजूनही सुधारणेला वाव असल्याची पुष्टीही

नवी दिल्ली : निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर महान फलंदाज सचिन तेंडुलरच्या मते, भारतीय क्रिकेट ‘योग्य दिशेने’ मार्गक्रमण करीत आहे; परंतु अजूनही सुधारणेला वाव असल्याची पुष्टीही त्याने जोडली आहे.
निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट ज्या दिशेने जात आहे त्यावर खूष आहे का, असे सचिनला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारतीय क्रिकेट योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. तथापि, माझ्या दृष्टीने आम्हाला आणखी चांगले क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे आणि सुधारण्यासाठी अजून वाव आहे. जोपर्यंत भूक राहील तोपर्यंत सर्व काही योग्य मार्गावर असेल.’’
तुम्ही तुमची एकाग्रता भंग होऊ देऊ शकत नाहीत, कारण तुम्हाला देश पाहत असतो. तुम्हाला अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप कटिबद्धतेची गरज असते, असे सांगतानाच सचिनने भारताचे सध्याचे फलंदाज
फिरकी गोलंदाजाविरुद्ध चांगले खेळत नाहीत, ही धारणा खोटी असल्याचे स्पष्ट केले.
या ४२ वर्षीय माजी महान फलंदाजाने त्याच्या जीवनातील दुसऱ्या डावावर समाधान व्यक्त केले.
तो म्हणाला, ‘‘सर्वांत पहिले काही बाबींमध्ये लक्ष्य प्राप्त करणे, सामना जिंकणे आणि संघाच्या आवश्यकतेनुसार काम करण्याशी निगडित असतात. मी माझ्या जीवनातील दुसरा डावात पूर्णपणे समाधानी आहे. माझी उपेक्षित लोकांसाठी काही करण्याची इच्छा आहे. काही मर्यादेपर्यंत असे करण्यात मी यशस्वी झाल्याचे खूप समाधान वाटत आहे.’’
क्रिकेटपासून वेगळे होण्याची भावना निर्माण झाली का, असे विचारले असता तेंडुलकर म्हणाला, ‘‘नाही. क्रिकेटपासून वेगळे झाल्याची तशी कोणतीही भावना नाही. मी नेहमीच खेळाशी प्रेम करीत राहणार आहे. तथापि, मी नियमितपणे क्रिकेट सामना पाहू शकेन, हे सांगता येणार नाही; परंतु वेळ मिळाल्यास मी त्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो. सामन्यात रोमहर्षकता असेल तरी मी पाहतो. जेव्हा मी घरी असतो तेव्हा अर्जुन आणि अंजली माझ्यासोबत सामना पाहतात आणि हा खेळ खेळल्यामुळे काय होणार आहे, हे मला माहीत असते.’’(वृत्तसंस्था)

मला असे वाटत नाही. इंडियन प्रिमीयर लीगमुळे परदेशातील खेळाडूंना मदत मिळत आहे. याआधी परदेशातील खेळाडूंना भारतात खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. आता प्रत्येक देशातील चार किंवा पाच खेळाडू अथवा त्यापेक्षा अधिक आयपीएलमध्ये सहभागी होतात. प्रशिक्षकही भारतात बराच वेळ व्यतीत करीत आहे आणि ते भारतीय वातावारणाशी जुळवून घेत आहेत. आम्ही दरबन आणि पर्थमध्ये कसोटी सामने जिंकले, याचा अर्थ दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज खराब आहेत, असा होत नाही.
- सचिन तेंडुलकर