शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

भारत चौथ्या स्थानी

By admin | Updated: December 15, 2014 00:01 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला आज, रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भुवनेश्वर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला आज, रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताला काल, शनिवारी उपांत्य फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ३-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने या धक्क्यातून सावरताना तिसऱ्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या लढतीत चांगली कामगिरी केली; पण ५२ व्या मिनिटाला स्वीकारावा लागलेल्या गोलमुळे त्यांचे तिसरे स्थान पटकाविण्याचे स्वप्न भंगले. भारताला या स्पर्धेत पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ २०१२ मध्ये मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या स्पर्धेत पाकविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर होता. अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलेला १३ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाला यावेळी तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाने यापूर्वी सलग पाचवेळा या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला आहे.
आज खेळल्या गेलेल्या लढतीत आॅस्ट्रेलियातर्फे १८ व्या मिनिटाला अ‍ॅडी ओकेनडेनने मैदानी गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारताला बरोबरी साधण्यासाठी ४२ व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ललित उपाध्यायने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला मॅट गोड््सने मैदानी गोल नोंदवीत आॅस्ट्रेलियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी जोरकस प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. भारतीय संघ यापूर्वी २०१२, २००४, २००३, २००२, १९९६ व १९८३ मध्ये चौथ्या स्थानावर होता. भारताने १९८२ मध्ये केवळ एकदा तिसरे स्थान पटकाविले होते. (वृत्तसंस्था)