शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही मी लोकांच्या आठवणीत!

By admin | Updated: June 1, 2016 03:36 IST

आज इतक्या वर्षांनंतरही लोक मला ओळखतात, याची खरंच कल्पना नव्हती. अपघाताने मी या खेळाकडे वळालो आणि याच क्रिकेटने मला आजवर खूप दिले असून त्याचा मी ऋणी आहे

मुंबई : आज इतक्या वर्षांनंतरही लोक मला ओळखतात, याची खरंच कल्पना नव्हती. अपघाताने मी या खेळाकडे वळालो आणि याच क्रिकेटने मला आजवर खूप दिले असून त्याचा मी ऋणी आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया भारताला परदेशी भूमीवर पहिला विजय मिळवून देणारे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल, श्रीफल व चंदेरी बॅट देऊन वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मंगळवारी वाडेकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘आपला लाडका अजित’ कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार व मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. या वेळी माधव आपटे, मिलिंद रेगे, सुनील गावसकर, प्रवीण आमरे, मोहमद अझरुद्दिन, विनोद कांबळी या माजी क्रिकेटपटूंनी वाडेकर यांच्यासह जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या ७५व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या दिमाखदार सोहळा आणि त्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या आपल्या चाहत्यांकडे पाहून भारावलेले वाडेकर यांनी सांगितले, ‘‘मी शाळेत कधीही क्रिकेट खेळलो नाही. मात्र, रुईया महाविद्यालयामध्ये शिकत असताना एका सामन्यादरम्यान १२व्या खेळाडूची आवश्यकता असताना मला निवडले गेले. या वेळी माझ्यावर केवळ पाणी देण्याचे काम सोपविले होते आणि त्यासाठी दिवसाला ३ रुपये मिळणार होते. आज त्या ३ रुपयांनी मला जी किंमत दिली, ती मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. या ३ रुपयांनी माझे आयुष्य बदलून टाकले.’’ (क्रीडा प्रतिनिधी)जोपर्यंत भारतात क्रिकेट आहे, तोपर्यंत कोणीही वाडेकर यांना विसरणार नाही. भारतीय क्रिकेटला आपण परदेशातही जिंकू शकतो, असा विश्वास वाडेकर यांनी दिला. भारत केवळ घरच्या मैदानावरच जिंकू शकतो, ही मानसिकता वाडेकर यांनी बदलली. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सुवर्णपाने आहेत; मात्र वाडेकर यांनी लिहिलेल्या सुवर्णपानाशिवाय भारतीय क्रिकेट कधीच पूर्ण होणार नाही.केवळ खेळाडू म्हणूनच नाही, तर व्यक्ती म्हणूनही वाडेकर हे एक अष्टपैलू आहेत. खेळाडू, फलंदाज, कर्णधार त्यानंतर व्यवस्थापक अशा सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी ठामपणे सांभाळल्या. केवळ सांभाळल्याच नाहीत तर त्यांना साजेशी योग्य कामगिरीही वाडेकर यांनी केली.- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री