शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या कुस्तीचे मिळाले होते ‘चार आणे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2015 22:29 IST

‘‘विजेतेपदाबद्दल खेळाडूंना सध्या लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार मिळतात. पण एक वेळ अशीही होती, की पहिली कुस्ती जिंकली तेव्हा चार आणे (२५ पैसे) हातावर पडले होते

नवी दिल्ली : ‘‘विजेतेपदाबद्दल खेळाडूंना सध्या लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार मिळतात. पण एक वेळ अशीही होती, की पहिली कुस्ती जिंकली तेव्हा चार आणे (२५ पैसे) हातावर पडले होते.’’ सर्वश्रेष्ठ कुस्तीगुरू महाबली सतपाल यांनी स्वत:च्या ६१व्या वाढदिवशी हे रहस्योद्घाटन खेळाडूंपुढे केले. एका स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर खेळाडूंना यशाची पायरी सर करण्यासाठी कठोर मेहनतीवाचून पर्याय नसल्याचे सांगितले.आॅलिम्पिकपदक विजेते सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांचे ‘गुरू’ पद्मश्री सतपाल यांनी स्वत:च्या कारकिर्दीला उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘मी आयुष्यात तीन हजार कुस्त्या जिंकल्या. दिवसभरात २१ कुस्त्या जिंकण्याचा विश्वविक्रमही माझ्याच नावावर आहे. पहिली कुस्ती जिंकल्याचे माझे बक्षीस चार आणे होते. मी एका वेळी चार कुस्त्या जिंकल्याने चार वेळा चार आणे कमविले होते. पण काळ बदलत गेला. अखेरची कुस्ती खेळण्याआधीच माझ्या खात्यात सहा लाख जमा करण्यात आले होते.’’सतपाल यांनी मुलांना कठोर मेहनत करण्याचे आवाहन करीत स्वत:ची दिनचर्या सांगितली. लक्ष्य नेहमी मोठे ठेवा म्हणजे यश मिळते. मी पराभव मान्य करत नाही. शिष्यांनादेखील कठोर मेहनत करण्याचा सल्ला देतो. सुशीलला नेहमी हेच सांगितल्याने तो आपल्यापुढे यशस्वी मल्ल होऊन उभा असल्याचे सतपाल यांनी सांगितले. दरम्यान, त्यांचे शिष्य सुशील, योगेश्वर, अमित, बजरंग यांनी महाबलींचा वाढदिवस छत्रसाल आखाड्यात साजरा केला. आगामी रियो आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यास कटिबद्ध राहू, असा दोघांनीही गुरूंना शब्द दिला. (वृत्तसंस्था)मी रोज आठ तास सराव करायचो. आठ हजार बैठका आणि त्यानंतर आठ हजार दंड. त्याशिवाय १५ किमी दौड लावत होतो. पहिल्यांदा आॅलिम्पिकमध्ये उतरलो तेव्हा वय होते अवघे १६ वर्षे! अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हा १७ वर्षांचा होतो. याच वर्षी मी ‘भारतकेसरी’ आणि ‘रुस्तम-ए- हिंद’ बनलो. कुठल्याही यशात गुरू आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा असतो. गुरूची शक्ती नसेल तर काही खरे नाही. गुरू हनुमानसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात गुरुस्थानी आली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानतो. मी गुरूचा मार खात होतो कारण त्यांना माझ्याकडून अपेक्षा होत्या. मार खाल्ल्यामुळेच अन्य मल्ल जे सहा महिन्यांत शिकायचे ते मी एका महिन्यात शिकलो. - महाबली सतपाल