शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा बुधवार ठरला शून्य अपघातांचा

By admin | Updated: November 18, 2016 02:36 IST

कल्याण-ठाणेदरम्यान बुधवारी एकही अपघाताची नोंद झाली नाही. त्यामुळे हा दिवस शून्य अपघाताचा ठरला.

अनिकेत घमंडी / डोंबिवलीमध्य रेल्वेवर वाढत्या प्रवाशांच्या संख्येबरोबर अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. अपघात रोखण्यासाठी सर्व स्तरांवर विविध उपाययोजना, जागृती केली जात असली तरी दिवसाला सरासरी आठ ते १० जणांचा मृत्यू होतो. तर, तितकेच प्रवासी जखमी होतात. मात्र, कल्याण-ठाणेदरम्यान बुधवारी एकही अपघाताची नोंद झाली नाही. त्यामुळे हा दिवस शून्य अपघाताचा ठरला.कल्याण-ठाणे मार्गावर ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही लोहमार्ग पोलीस ठाणी येतात. त्यांच्या हद्दीत ट्रान्स-हार्बर मार्गावरील ऐरोली, दिवा-वसई मार्गावरील भिवंडी दुसरीकडे निळजे तसेच कसारा आणि बदलापूरपर्यंतचा परिसर येतो. या हद्दीत रेल्वे फाटक तसेच रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ठाकुर्ली येथे होणारे अपघात रोखण्यासाठी फाटकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील अपघातांचे प्रमाण शून्यावर आले आहे. ठाण्यात फलाट क्रमांक-२ च्या पुढे सिडको स्टॉपकडे रुळांतून चालणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे तेथेही पोलीस नेमण्यात आला आहे. परिणामी, प्रवाशांनी आता रुळांतून चालणे बंद केले आहे. रूळ ओलांडताना गाड्यांच्या धडकेत तसेच सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी गाड्यांमधून पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. फलाट आणि गाडीतील गॅपमध्ये अडकून तोल जाणे, छतावर बसून प्रवास करणे, धावती गाडी पकडणे अथवा उतरणे यामुळेही अपघात घडत आहेत. हे वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन वारंवार जागृती तसेच उपाययोजना करत आहे. प्रवाशांनी स्वत:हूनच त्यांचा जीव धोक्यात घालवू नये, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाची आहे.