शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 01:22 IST

शासनाची पाणी योजना अद्याप पोहोचलीच नाही; आदिवासींचे हाल

ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही.

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धाब्याचीवाडी या आदिवासी बांधवांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तेथील महिलांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण करावी लागत आहे. शासनाच्या पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने मैलोन‌्मैल पायपीट करून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही. काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आल्या; मात्र त्याही पाणीच नसल्याने बिनकामाच्या ठरत आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या पाणी वाहतुकीच्या फिरत्या ड्रममुळे महिलांचा डोईवरील भार खांद्यावर आला आहे. ड्रमच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणणे काहीसे सोपे झाले आहे तरीही त्यांच्या नशिबाची पायपीट काही कमी झाली नाही. रात्र जागून पिण्यासाठी पाणी आणणे नित्याचेच  झाले आहे. केवळ मोलमजुरीवर आपली उपजीविका करणाऱ्या या आदिवासींना दिवसरात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना रोजगार बुडत असून, त्याचा परिणाम उदरनिर्वाहावर होत आहे. खेदाची बाब म्हणजे पावसाळी दिवसातही ओढ्या-नाल्यात खड्डे खोदून त्यातील पाणी भरून आणावे लागते किंवा छताच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन  गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.ऑक्टोबर महिन्यापासूनच येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील कूपनलिका व  विहिरीही कोरड्या पडत असल्याने येथील महिलांना  एक-दोन किलोमीटरवर असलेल्या बांगरवाडी, चाफेवाडी येथील नदी-नाल्यातून  पाणी आणावे लागत आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी वारंवार शासनदरबारी पाणीटंचाईमुक्तीसाठी निवेदने दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल  घेतली जात नसल्याने पाणीटंचाई समस्या कायम असल्याची  येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKarjatकर्जत