शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 1:22 AM

शासनाची पाणी योजना अद्याप पोहोचलीच नाही; आदिवासींचे हाल

ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही.

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धाब्याचीवाडी या आदिवासी बांधवांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तेथील महिलांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण करावी लागत आहे. शासनाच्या पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने मैलोन‌्मैल पायपीट करून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही. काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आल्या; मात्र त्याही पाणीच नसल्याने बिनकामाच्या ठरत आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या पाणी वाहतुकीच्या फिरत्या ड्रममुळे महिलांचा डोईवरील भार खांद्यावर आला आहे. ड्रमच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणणे काहीसे सोपे झाले आहे तरीही त्यांच्या नशिबाची पायपीट काही कमी झाली नाही. रात्र जागून पिण्यासाठी पाणी आणणे नित्याचेच  झाले आहे. केवळ मोलमजुरीवर आपली उपजीविका करणाऱ्या या आदिवासींना दिवसरात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना रोजगार बुडत असून, त्याचा परिणाम उदरनिर्वाहावर होत आहे. खेदाची बाब म्हणजे पावसाळी दिवसातही ओढ्या-नाल्यात खड्डे खोदून त्यातील पाणी भरून आणावे लागते किंवा छताच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन  गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.ऑक्टोबर महिन्यापासूनच येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील कूपनलिका व  विहिरीही कोरड्या पडत असल्याने येथील महिलांना  एक-दोन किलोमीटरवर असलेल्या बांगरवाडी, चाफेवाडी येथील नदी-नाल्यातून  पाणी आणावे लागत आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी वारंवार शासनदरबारी पाणीटंचाईमुक्तीसाठी निवेदने दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल  घेतली जात नसल्याने पाणीटंचाई समस्या कायम असल्याची  येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKarjatकर्जत