शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सागरी पोलिसांनी पकडले दोन अतिरेकी?

By admin | Updated: November 14, 2014 22:58 IST

मंत्रलयात आरडीएक्सच्या साहाय्याने बॉम्बस्फोट करण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या दोन अतिरेक्यांना सातपाटी सागरी पोलिसांनी वडराईच्या जेटीवर जेरबंद केले.

पालघर : मासेमारीसाठी गेलेल्या नौकेमधून वडराई जेटीवर लॅण्डिंग करीत थेट पालघर स्टेशनवरून ट्रेनने मुंबई गाठून मंत्रलयात आरडीएक्सच्या साहाय्याने बॉम्बस्फोट करण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या दोन अतिरेक्यांना सातपाटी सागरी पोलिसांनी वडराईच्या जेटीवर जेरबंद केले. ही बातमी वा:यासारखी किनारपट्टीवरील गावात पोहोचल्यानंतर एकच खळबळ माजली. परंतु, हे अतिरेकी डमी असल्याचे व सागरी सुरक्षा कवच अभियानाचा तो एक भाग असल्याचे सर्वाना कळल्यानंतर सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
26/11 च्या घटनेत समुद्रमार्गाने आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईत घडवलेल्या रक्तपातानंतर सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे सागरी मार्गातील सुरक्षा यंत्रणोची तपासणी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षी सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. या वर्षीही पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, तालुक्यातील किनारपट्टी भागासह माहीम, टेंभी, सफाळे, नांदगाव, पालघर, उच्छेडी, दांडी येथील कोस्टल चेकपोस्टवर पोलिसी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी संशयास्पद व्यक्ती वहाने यांची कसून तपासणी करण्यात येत होती. 
गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांच्या देखरेखीखाली सहायक पो.नि. भुजंग हातमोडेसह पाच अधिकारी, 73 कर्मचारी या सुरक्षा कवच मोहिमेत सहभागी झाले होते. काल संध्याकाळी वडराईच्या किना:यावर एका मच्छीमारी बोटीतून उतरलेले दोन अतिरेकी हे पालघर रेल्वे स्टेशनकडे जाण्याच्या तयारीत असताना पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर मुसळे, किरटकर, जाधव यांनी त्यांना अडवले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात आरडीएक्सचा साठा आढळून आला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आपण रेल्वेने मुंबईत जाऊन मंत्रलय बॉम्बस्फोटाने उडविणारे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोन अतिरेकी पकडल्याची माहिती वा:यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. 
परंतु, हे अतिरेकी डमी असून नेव्ही आणि कोस्टगार्डचे क र्मचारी असलेल्या या दोघांना भर समुद्रात मच्छीमारी बोटीतून पाठवले जाते. त्यांना पकडण्याचे चॅलेंज पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणोला असते. या परीक्षेत मात्र सातपाटी सागरी पोलीस यशस्वी झाल्याचे कालच्या घटनेतून निदर्शनास आले आहे. (वार्ताहर)
 
बोईसर : समुद्रकिनारी असलेली सुरक्षा किती सक्षम आहे, याचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सागरी सुरक्षा कवच अभियानात पालघर जिल्हा पोलिसांनी रेड फोर्सची बोट तारापूर अणुऊर्जा केंद्रासमोरील खोल समुद्रात पकडून मोहीम फत्ते करून तारापूर अणुऊर्जा केंद्राची सुरक्षा अबाधित असल्याचे दाखूवन दिले. कोस्टगार्ड, इंडियन नेव्ही व पालघर जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा कवच अभियान काल (दि. 13) व आज असे सलग दोन दिवस आयोजित केले होते. त्या वेळी रेड फोर्सच्या जवानांनी बोटीतून तारापूर, अणुशक्ती केंद्राकडे येण्याचा प्रयत्न करताच तारापूर पोलिसांनी रेड फोर्सची बोट समुद्रातच पकडून त्यांचे प्रय} हाणून पाडले. 
 
सागरी सुरक्षा कवच काय असते?
कोस्टगार्ड, इंडियन नेव्ही व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा कवच अभियानाचे आयोजन होते. त्यामध्ये कोस्टगार्डचे जवान रेड फोर्सच्या माध्यमाने समुद्रामार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना शोधून हुसकावण्याचे आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याचे काम जिल्हा पोलीस दलाचे ब्ल्यू फोर्स म्हणजे बचावाचे काम करीत असतात, तर रेड फोर्स घुसखोरी करण्यात यशस्वी झाले म्हणजे समुद्रकिना:यावरील सुरक्षा भेदली जाते, असे समजण्यात येते.