शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

नाशिककरांच्या विरोधामुळे शहापूर तालुक्याचा पाणीप्रकल्प रखडला, दीड लाख रहिवासी तहानलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:01 IST

भावली धरणातील पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील ११३ गावांतील सुमारे एक लाख ६० हजार ग्रामस्थांची तहान भागणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : भावली धरणातील पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील ११३ गावांतील सुमारे एक लाख ६० हजार ग्रामस्थांची तहान भागणार आहे. मात्र, या धरणातून पाणी उचलण्यास नाशिककरांनी विरोध दर्शवून स्वजिल्ह्यातील धरणांचा पर्याय शोधण्यास सांगितले आहे. यामुळे सुमारे २५० कोटींचा आदिवासी गावपाड्यांसाठी होणारा हा ग्रीडपद्धतीच्या गुरुत्ववाहिनीचा पाणीपुरवठा प्रकल्प रखडण्यास राजकारण कारणीभूत असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळ हे भावली धरण आहे. ग्रीडपद्धतीच्या गुरुत्ववाहिनीद्वारे या धरणातून सुमारे ६०.५५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी उचलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील एक वर्षापूर्वी मंजुरी दिली होती. पण, बृहन्मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे शहापूर तालुक्यात आहेत. त्यापैकी एखाद्या धरणातील पाणी उचलून आदिवासी गावपाड्यांची पाणीटंचाई दूर करण्याचा सल्ला देऊन नाशिककरांनी भावलीतील पाणी उचलण्यास विरोध दर्शवल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे. यामुळे या प्रकल्पास मंजुरी मिळवून श्रेय लाटणाऱ्या लोकप्रतिनिधींसह प्रशासकांच्या घोषणा केवळ आश्वासनाच्या वल्गना ठरल्या आहेत.शहापूर तालुक्यातील ११३ गावपाड्यांमधील सुमारे एक लाख ६० हजार आदिवासी कुटुंबीयांच्या मुबलक पाणीपुरवठ्यासाठी या भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार होते. या गावपाड्यांना माणशी ७० लीटर मुबलक पाणी मिळणार होते. त्यासाठी भावलीतून ६०.५५ दलघमी पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या या मंजुरीआधी केवळ ४.५५ दलघमी पाणी उचलण्याची मंजुरी होती. मागील सुमारे चार वर्षांपासून या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू होता.ठाणे जिल्हा परिषदेसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याद्वारे हा प्रकल्प मार्गी लागला होता. ग्रीडपद्धतीने गुरुत्ववाहिनीद्वारे उंचावरील गावपाड्यांना सहज पाणीपुरवठा करता येणार होता. यामुळे या पाणीपुरवठ्याच्या देखभाल, दुरुस्तीला फारसा खर्च येणार नाही. आगामी दोन वर्षांत या योजनेचे कामकाज पूर्ण होणार होते.स्टेम कंपनी करणार होती देखभाल दुरुस्तीमहाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या स्टेम कंपनीद्वारे या प्रकल्पाची देखभाल, दुरुस्तीचे नियोजन होते. या सेवेच्या बदल्यात कंपनी पाणीपट्टी वसूल करून प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येणार होते.या प्रकल्पासाठी लागणाºया २०० कोटी रुपये खर्चापैकी १०० कोटी रुपये आदिवासी विकास महामंडळ व उर्वरित खर्च स्टेम कंपनी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निश्चित झाले. पण, मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत भावलीतून पाणी उचलण्यास विरोध झाला.यास अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांना विचारणा केली असता ‘यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे’ असे सांगून त्यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले. 

टॅग्स :Waterपाणीshahapurशहापूर