शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

सानपाडा येथील पादचारी पुलाचा दुष्काळग्रस्तांसह निराश्रितांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 00:24 IST

उन्हाळ्यामध्ये हक्काचे आश्रयस्थान। बेघर नागरिकांकडून मुक्कामासाठी वापर

नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांसह बेघर नागरिकांसाठी सानपाडा पादचारी पूल आधार बनला आहे. दिवसभर मिळेल ते काम करून १०० पेक्षा जास्त निराश्रित रात्रीच्या मुक्कामासाठी पुलाचा वापर करत आहेत. स्मार्ट सिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी हाच सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे.

राज्यासह देशामध्ये सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. रोजगारही नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे अनेकांनी मुंबई व नवी मुंबईकडे प्रस्थान केले आहे. शेकडो दुष्काळग्रस्तांनी सानपाडामधील उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडांवर आश्रय घेतला आहे. पुलाखाली दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जातो. दत्तमंदिर व इतर ठिकाणावरून पाणी उपलब्ध केले जाते. सकाळी लवकर स्वयंपाक उरकून तुर्भे, नेरुळ व इतर नाक्यांवर कामाच्या शोधात जायचे व पुन्हा रात्री पुलाखाली येवून जेवण करायचे हा अनेक बेघरांचा रोजचा शिरस्ता. दिवसा पुलाखाली थांबता येत असले तरी रात्रीचा मुक्काम तेथे करणे सुरक्षित नसते. यामुळे रात्री मुक्कामासाठी रेल्वे स्टेशन व पादचारी पुलांचा आश्रय घेतला जात आहे. बसस्टॉप व इतर ठिकाणीही सुरक्षित जागा पाहून रात्री मुक्काम केला जात आहे.

सानपाडा दत्तमंदिर पादचारी पुलामुळेही निराश्रितांना आधार मिळत आहे. रात्री १०० पेक्षा जास्त नागरिक येथे मुक्कामासाठी येत आहेत. सायंकाळी ६ नंतर पुलावर रात्रीच्या मुक्कामासाठी जागा मिळावी, यासाठी धावपळ सुरू असते. अनेक जण दिवस मावळू लागला की पुलावर जाऊन जागा पकडतात. उशीर झाल्यास पुलावर मुक्कामासाठी जागाच उपलब्ध होत नाही. निराश्रितांची संख्या वाढल्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुलावरील जागाही कमी पडू लागली आहे. काही व्यक्ती स्वत:सह परिचितांसाठीही जागा धरून ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, हे सर्व निराश्रित पुलाचा वापर करताना तो अस्वच्छ होणार नाही व ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेत आहेत. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये वास्तव्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर चोरट्यांची भीती वाटते. डासांचा उपद्रवही जास्त असतो. वीज नसल्यामुळे गैरसोय होत असते. साप, विंचवाचीही भीती असते, यामुळे दिवसभर पुलाखाली थांबणारे निराश्रित रात्री मात्र पुलावर किंवा रेल्वे स्टेशन परिसराला पसंती देत आहेत.

नवी मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांनी सांगितले की, गावाकडे उन्हाळ्यामध्ये रोजगाराची साधने नसतात. हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ येते. यामुळे फेब्रवारी ते एप्रिलच्या दरम्यान नवी मुंबईमध्ये येतो. काही नागरिक दिवाळीनंतरच येथे येत असतात. आम्ही कुठेही अतिक्रमण करत नाही. जिथे जागा मिळेत तेथे थांबतो व पुन्हा गावाकडे जातो. आतापर्यंत महापालिका किंवा इतर कोणीही त्रास दिला नाही. अनेकांनी सहाकार्य केल्याचेही सांगितले.

गावाकडे दुष्काळाची स्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला रोजगार नाही, यामुळे उन्हाळ्यामध्ये रोजगारासाठी नवी मुंबईमध्ये आलो आहोत. दिवसभर नाक्यावर काम करतो व रात्रीच्या मुक्कामासाठी पादचारी पुलावर येत आहे. उड्डाणपुलाखाली रात्री थाबणे असुरक्षित असल्यामुळे आश्रय घेत आहोत. - विठ्ठल चव्हाण, दुष्काळग्रस्त

टॅग्स :droughtदुष्काळNavi Mumbaiनवी मुंबई