शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सानपाडा येथील पादचारी पुलाचा दुष्काळग्रस्तांसह निराश्रितांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 00:24 IST

उन्हाळ्यामध्ये हक्काचे आश्रयस्थान। बेघर नागरिकांकडून मुक्कामासाठी वापर

नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांसह बेघर नागरिकांसाठी सानपाडा पादचारी पूल आधार बनला आहे. दिवसभर मिळेल ते काम करून १०० पेक्षा जास्त निराश्रित रात्रीच्या मुक्कामासाठी पुलाचा वापर करत आहेत. स्मार्ट सिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी हाच सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे.

राज्यासह देशामध्ये सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. रोजगारही नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे अनेकांनी मुंबई व नवी मुंबईकडे प्रस्थान केले आहे. शेकडो दुष्काळग्रस्तांनी सानपाडामधील उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडांवर आश्रय घेतला आहे. पुलाखाली दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जातो. दत्तमंदिर व इतर ठिकाणावरून पाणी उपलब्ध केले जाते. सकाळी लवकर स्वयंपाक उरकून तुर्भे, नेरुळ व इतर नाक्यांवर कामाच्या शोधात जायचे व पुन्हा रात्री पुलाखाली येवून जेवण करायचे हा अनेक बेघरांचा रोजचा शिरस्ता. दिवसा पुलाखाली थांबता येत असले तरी रात्रीचा मुक्काम तेथे करणे सुरक्षित नसते. यामुळे रात्री मुक्कामासाठी रेल्वे स्टेशन व पादचारी पुलांचा आश्रय घेतला जात आहे. बसस्टॉप व इतर ठिकाणीही सुरक्षित जागा पाहून रात्री मुक्काम केला जात आहे.

सानपाडा दत्तमंदिर पादचारी पुलामुळेही निराश्रितांना आधार मिळत आहे. रात्री १०० पेक्षा जास्त नागरिक येथे मुक्कामासाठी येत आहेत. सायंकाळी ६ नंतर पुलावर रात्रीच्या मुक्कामासाठी जागा मिळावी, यासाठी धावपळ सुरू असते. अनेक जण दिवस मावळू लागला की पुलावर जाऊन जागा पकडतात. उशीर झाल्यास पुलावर मुक्कामासाठी जागाच उपलब्ध होत नाही. निराश्रितांची संख्या वाढल्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुलावरील जागाही कमी पडू लागली आहे. काही व्यक्ती स्वत:सह परिचितांसाठीही जागा धरून ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, हे सर्व निराश्रित पुलाचा वापर करताना तो अस्वच्छ होणार नाही व ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेत आहेत. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये वास्तव्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर चोरट्यांची भीती वाटते. डासांचा उपद्रवही जास्त असतो. वीज नसल्यामुळे गैरसोय होत असते. साप, विंचवाचीही भीती असते, यामुळे दिवसभर पुलाखाली थांबणारे निराश्रित रात्री मात्र पुलावर किंवा रेल्वे स्टेशन परिसराला पसंती देत आहेत.

नवी मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांनी सांगितले की, गावाकडे उन्हाळ्यामध्ये रोजगाराची साधने नसतात. हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ येते. यामुळे फेब्रवारी ते एप्रिलच्या दरम्यान नवी मुंबईमध्ये येतो. काही नागरिक दिवाळीनंतरच येथे येत असतात. आम्ही कुठेही अतिक्रमण करत नाही. जिथे जागा मिळेत तेथे थांबतो व पुन्हा गावाकडे जातो. आतापर्यंत महापालिका किंवा इतर कोणीही त्रास दिला नाही. अनेकांनी सहाकार्य केल्याचेही सांगितले.

गावाकडे दुष्काळाची स्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला रोजगार नाही, यामुळे उन्हाळ्यामध्ये रोजगारासाठी नवी मुंबईमध्ये आलो आहोत. दिवसभर नाक्यावर काम करतो व रात्रीच्या मुक्कामासाठी पादचारी पुलावर येत आहे. उड्डाणपुलाखाली रात्री थाबणे असुरक्षित असल्यामुळे आश्रय घेत आहोत. - विठ्ठल चव्हाण, दुष्काळग्रस्त

टॅग्स :droughtदुष्काळNavi Mumbaiनवी मुंबई