शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

नदीत रासायनिक पाणी सोडणा-यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:07 IST

कासाडी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडत असलेला टँकर खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : कासाडी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडत असलेला टँकर खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीमध्ये सोडत आहेत. अनेक जण थेट नदीमध्ये पाणी सोडत आहेत. एमआयडीसीच्या बाहेरूनही टँकरमधून रसायनमिश्रित पाणी नाल्यांमध्ये सोडत असून, तेथून ते नदीमध्ये जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोडपालीमधील स्थानिक नागरिक योगेश पकडे व त्यांचे सहकारी कासाडी नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी लढा देत आहेत. याविषयी अनेक तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व शासनाकडे केल्या आहेत; परंतु त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. १५ जूनमध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल सदृश पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे खंडणी विरोधी पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. डी. मोहेकर यांना माहिती दिली. मोहेकर यांनी तत्काळ याविषयी उपप्रादेशिक अधिकारी जयवंत शंकर हजारे यांना माहिती दिली. हजारे यांनी घटनास्थळी जाऊन एमएच ४६ एआर ७८१८ या टँकरमधील पाण्याचे नमुने ताब्यात घेतले. पोलिसांसमोर पंचनामा करण्यात आला. रसायनमिश्रित पाण्याचे नमुने तळोजामधील मुंबई वेस्ट मेंटनन्स कंपनीमध्ये पाठविण्यात आले होते. १७ जूनला रसायनमिश्रित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्या पाण्याचा पीएच ३.६ व सीओडी ३९६०० एवढा असल्याचे निदर्शनास आले. हा अहवाल प्रादेशिक अधिकारी हजारे यांनी तळोजा पोलीस स्टेशनकडे पाठवून तक्रार केली होती.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा नोंदविला आहे. रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडून तेथील वातावरणास अपाय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे नदीमध्ये दूषित पाणी सोडणाºयांचे धाबे दणाणले आहे. वास्तविक नियमितपणे टँकरमधून व थेट नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडले जात असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.कारखानदारांवर कारवाई व्हावीनाल्यात दूषित पाणी सोडणाºया टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे; परंतु प्रत्यक्षात ज्या कारखान्यातून हे दूषित पाणी आणण्यात आले त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.याशिवाय अनेक कारखानदार थेट नदीमध्ये दूषित पाणी सोडत असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याशिवाय प्रदूषण थांबणार नसल्याचे मतही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.