शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:18 IST

भाजपसमोर पेच; युतीच्या वाटाघाटीवर सेनेच्या उमेदवारीचे भवितव्य

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. त्यानुसार सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. भाजपच्या विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांनी या जागेवर आपला प्रबळ दावा केला आहे. तर अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तिकीट वाटपाचा हा घोळ मिटविताना भाजपची कसरत होणार आहे.विधानसभेच्या २0१४ मधील निवडणुकीत नाईक यांचा पराभव करून मंदा म्हात्रे जायंट किलर ठरल्या होत्या. निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन म्हात्रे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. तर शिवसेनेने विजय नाहटा यांना रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. यात मोदी लाटेचा करिष्मा मंदा म्हात्रे यांच्या पथ्यावर पडल्याने त्या अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. आमदार म्हणून त्यांनी पाच वर्षांत विविध कामांची पूर्तता केली. मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा घडवून आणली. मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवला. त्यामुळेच पक्षाकडून यावेळीसुद्धा आपणालाच संधी मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले गणेश नाईक यांनीसुद्धा बेलापूरमधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी स्वत:हून तसे संकेत दिले नसले तरी त्यांच्या समर्थकांकडून मात्र बेलापूरमधून त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तशा अशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. गणेश नाईक हे राज्यातील वजनदार नेते आहेत. तसेच त्यांच्या पक्षांतरामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. शिवाय त्यांचा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा ठाणे जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी होणार आहे. तर मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या कामाचा आलेखही चांगला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून तिकीट वाटपात कोणाला झुकते माप मिळते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा