शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

कुणबी समाजाने संघटित होण्याची गरज, वाशीत मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:53 AM

कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

नवी मुंबई - कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या समस्या निकाली काढण्यासाठी कुणबी समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या वतीने वाशीत, कुणबी समाजाच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यास विविध जिल्ह्यांतील कुणबी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष भूषण बरे, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष अविनाश लाड, युवा अध्यक्ष माधव कांबळे, सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते. कोकणात मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे वास्तव्य असूनही, त्यांना स्वत:च्या समस्यांचे गाºहाणे मांडण्यासाठी हक्काचा एकही लोकप्रतिनिधी नाही. आजही त्यांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तर इतर लोकप्रतिनिधींकडून कुणबी समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. समाजाचे बहुतांश तरुण उच्चशिक्षित असतानाही त्यांच्यापुढेही नोकरी व्यवसायाच्या समस्या आहेत, त्यामुळे कुणबी समाजाने संघटित होण्याचे आवाहन समाजोन्नती संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी समाजासाठी राजकीय सत्तेचे दार उघडण्याकरिता एकजूट होण्याचेही आवाहन करण्यात आले. तसेच कुणबी समाजाच्या भावना मांडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना संघाच्या वतीने पत्र पाठवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. समाजातील व्यक्ती जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये कार्य करत असतील, त्यांनी कुणबी समाजाच्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली. असे झाले तरच समाजाचा पाया भक्कम होऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या निकाली लागतील, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. शहरी भागात वास्तव्य करणारा कुणबी समाज जागरूक झालेला आहे; परंतु ग्रामीण भागात अद्यापही मत परिवर्तनाची गरजही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या