शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 2:02 AM

राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे यानंतर उभारणाºया कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार नाही, हे स्पष्ट आहे

नवी मुंबई : राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे यानंतर उभारणाºया कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. असे असतानाही शहरात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. भूमाफियांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे.  विशेषत: गाव-गावठाणात फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांनी जोर धरला आहे. या बांधकामांना प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान सिडको आणि महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृत इमारती उभारल्या आहेत. भूमाफियांनी स्थानिकांना हाताशी धरून मोकळ्या जागा बळकावून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत.   गरजेपोटीच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा प्रश्न सिडको आणि महापालिकेसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. परंतु राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. नवी मुंबईतील जवळपास वीस हजार बांधकामांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे २0१५ नंतर उभारलेल्या बांधकामांवर महापालिका व सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. इतकेच नव्हे, तर नवीन बांधकामे उभारू नयेत, यादृष्टीनेही उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु सिडको व महापालिकेकडून करण्यात येणाºया उपाययोजना तोकड्या ठरताना दिसत आहेत. कारण आजही गाव-गावठाणात बिनदिक्कत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना रोक लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

  • कारवाईचा धडाका 

महापालिका आणि सिडकोने २0१५ नंतरच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी सिडकोने ऐरोली सेक्टर ९ व १0 मधील चाळीस अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर कारवाई केली. तर मंगळवारी महापालिकेने बेलापूर-शहाबाज येथील बांधकाम सुरू असलेल्या एका दोन मजली इमारतीवर बुलडोझर फिरविला. एकीकडे कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे बांधकामांचा धडाका सुरू असल्याने दोन्ही प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.