शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीचा विकास झाडांत अडला

By admin | Updated: December 21, 2015 02:07 IST

पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या विकासाला जुलैच्या महासभेत मान्यता मिळाली. परंतु झाडांच्या अस्तित्वाने अद्याप विकास झाला

भार्इंदर : पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या विकासाला जुलैच्या महासभेत मान्यता मिळाली. परंतु झाडांच्या अस्तित्वाने अद्याप विकास झाला नसून ही झाडे पुनर्रोपणासाठी स्थलांतरित करून विकासाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी ४ महिन्यांपासून प्रतीक्षा सुरू आहे.‘ड’ वर्गातील काही महापालिकांच्या तुलनेत येथील स्मशानभूमी विकसित असल्या तरी त्यांतील काहींचा विकास अत्याधुनिक पद्धतीने व्हावा, यासाठी जुलै २०१५ च्या महासभेत सुरुवातीला भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या विकासाला मंजुरी दिली. त्यासाठी ९० लाखांच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने पहिल्या टप्प्यात विकासावर ५० लाख खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रशासनाने कामाला सुरुवात केल्यानंतर स्थानिक नगरसेवक व रहिवाशांनी विकासाच्या आराखड्यावर हरकती घेत त्यात बदल करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने सुरुवातीचा आराखडा बदलल्याने पहिल्या टप्प्यातील विकासाचा खर्च २६ लाखांनी वाढून तो ७६ लाखांवर गेला आहे. बदललेल्या आराखड्यानुसार होणारा विकास स्मशानभूमीतील सुमारे २० मोठ्या झाडांच्या अस्तित्वाने अडल्याने ही झाडे पुनर्रोपणासाठी स्थलांतरित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार महिन्यांपासून सुरू आहे. या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्यांकरिता पायऱ्यांच्या धर्तीवर आरसीसीची आसनव्यवस्था करण्यात येणार असून त्याखाली लाकडांचे गोदाम, कार्यालयासाठी खोल्या बांधण्यात येणार आहेत. आसनव्यवस्थेसमोरच मृतदेह जाळण्यासाठी ४ शेगड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी फायबर मोल्डिंगच्या शेड बांधण्यात येणार असून उर्वरित जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हा विकास साधण्यासाठी त्याच्या आड येणारी झाडे स्थलांतरित करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत असला तरी ही झाडे अद्याप स्थलांतरित करण्यात आलेली नाही. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, विकास आराखडा बदलल्याने झाडांचा अडसर निर्माण झाला असून त्यांचे इतरत्र रोपण केल्यास विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. दीपक पवार-कुरुळेकर यांनी सांगितले की, ही झाडे स्थलांतरित करण्याच्या मागणीवर वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसारच कार्यवाही करण्यात येणार आहे.