शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:42 AM

मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे.

नवी मुंबई - मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे. रमजानमुळे पुढील एक महिना आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील तापमान ३३ ते ४० अंशावर गेले आहे. उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. यामुळे काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. एक महिन्यापासून फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. रोज कोकणसह दक्षिणेतील राज्यांमधून तब्बल ८०० ते १६०० टन आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. गत आठवड्यामध्ये एकाच दिवशी सव्वालाख पेट्यांची आवक झाली होती.होलसेल मार्केटमध्ये २०० ते ५०० रुपये दराने हापूस आंब्याची विक्री होत असून इतर आंबा ३० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. उन्हाळ्यामुळे कलिंगडाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागामधून व इतर राज्यांमधून रोज ५०० ते ६०० टन कलिंगडाची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये ८ ते १३ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. मोसंबी व संत्रीचीही जवळपास २०० टन आवक सुरू आहे. खरबुजालाही शहरवासीयांकडून मागणी वाढत असून जवळपास १५० टन आवक रोज होत आहे.रमजानच्या महिन्यामध्ये फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. पुढील एक महिना मार्केटमधील आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कलिंगड, खरबूज व आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे. देशभरातून मार्केटमध्ये फळांची आवक होत आहे. विदेशामधूनही या तीन वस्तूंना मोठी मागणी असून आखाती देशामधील निर्यात या महिन्यात दुपटीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढू लागली आहे. पुढील एक महिना आंब्यासह कलिंगड, खरबूज व इतर फळांना मागणी जास्त असणार आहे. आखाती देशांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :foodअन्नNavi Mumbaiनवी मुंबई