शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Corona Vaccination: नवी मुंबईमध्येही कोरोना लसीचा तुटवडा; ४२ पैकी ३८ केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 1:37 AM

नवीन डोस मिळाले तरच शुक्रवारी लसीकरण

नवी मुंबई : शहरामध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुरूवारी फक्त ३५१० डोस शिल्लक असल्यामुळे ४२ पैकी ३८ केंद्र बंद करावी लागली होती. नवीन डोस उपलब्ध झाले तरच शुक्रवारी लसीकरण सुरु ठेवता येणार आहे.            नवी मुंबईमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेने तब्बल ४२ केंद्र सुरु केली होती. यामध्ये २६ महानगरपालिकेची व १६ खासगी रुग्णालयांमधील केंद्रांचा समावेश होता. बुधवारी रात्रीपर्यंत शहरातील १ लाख ४१ हजार ७९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले होते. मनपाकडे फक्त ३५१० डोस उपलब्ध होते. गुरूवारी सकाळी डोस उपलब्ध असलेल्या मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, दुपारनंतर जवळपास ३८ केंद्रांमधील लस संपल्यामुळे ती बंद करण्यात आली. मनपाच्या वाशी, ऐरोली, नेरूळ व वाशीतील जम्बो केंद्रात सायंकाळपर्यंत लसीकरण सुरू होते. महानगरपालिका प्रशासनाने लसीचे डोस उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत नवीन डोस मिळाले तरच लसीकरण सुरू ठेवता येणार आहे. अन्यथा सर्व केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरण वेगाने होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी अनेक नागरिक महानगरपालिका व खासगी सेंटरमध्ये लस घेण्यासाठी व नोंदणीसाठी जात होते. परंतु, तेथे लस नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे नाराज होऊन परत जावे लागत होते.नागरिकांमध्ये असंतोषनवी मुंबईमध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गुरुवारी अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत घरी जावे लागले. नवीन लस कधी येणार, याविषयीही ठोस माहिती दिली जात नव्हती. यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना रोखण्यासाठी लसीकरणामध्ये खंड पडून देऊ नये. पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस