शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे; माफीनामा लिहून दिला तरच सुटका ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 01:01 IST

घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

अनंत पाटीलनवी मुंबई : ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्हा साष्टी तालुक्याचा भाग म्हणून संबोधला जात असे. आताच्या ठाणे शहराच्या पूर्वेस खाडी किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला असून त्या किल्ल्याचे रुपांतर आता ठाणे तुरुंगात झाले आहे. याच तुरुंगात ब्रिटिश सरकारने ज्वलंत क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली होती. असंख्य देशभक्तांना लोखंडी गजाआड डांबून ठेवले म्हणून हे ठाण्याचे कारागृह स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे होते. घणसोली गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारी “स्वातंत्र्यसंग्राम चौक” वास्तू आहे.

महादेव काळदाते,डॉ.देसाई,दत्तू वाळक्या, वाल्मिक कोतवाल,वकील दामले यांच्या नेतृत्वाखाली ३० जानेवारी १९३० रोजी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. यात घणसोली येथील बामा म्हात्रे, सोमा कोळी, फकीर पाटील, राघो पाटील, कमला म्हात्रे, जोमा मढवी, पांडुरंग बोंद्रे, शंकरबुबा पाटील, रामा रानकर, वामन पाटील, सीताराम बामा, रघुनाथ पवार,नारायण मढवी, चाहु पाटील, हाल्या म्हात्रे, महादू पाटील, वाल्मिक पाटील, वाळक्या पाटील परशुराम  पाटील आदींनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. १३ एप्रिल १९३० रोजी सानपाडा येथील सोनखाडीतून मीठ घेऊन घोषणा देत सत्याग्रही ठाण्याच्या दिशेने जात असताना बोनकोडे येथे पोलिसांनी लाठीमार केला. त्यात गोठीवली गावच्या कान्हा म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाल्याने अपंगत्व आले. त्याच कालावधीत दिघा, ऐरोली, दिवा, रबा‌ळे, तळवली, गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, बेलापूरपर्यंत  बैठका घेऊन जनजागृती केली. १९४२ पर्यंत या सत्याग्रहींनी ब्रिटिशांची रेल्वे सेवा बंद होण्यासाठी रूळ काढण्याचे प्रकार केले, विजेचे खांब तोडणे,टेलिफोनच्या तारा कापून टाकणे याकामी जनजागृती केली. घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

माफीनामा लिहून दिला तरच सुटका १ जानेवारी १९३१ रोजी विलेपार्ले येथील परिषदेत घणसोली छावणीत सत्याग्रहींनी स्वयंसेवक म्हणून काम केले. तेव्हा त्यांना पकडून अंधेरीच्या तुरुंगात डांबले. १६ फेब्रुवारी १९३२ मध्ये घणसोली गावात तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्याने ब्रिटिशांनी अनेकांना अटक करून ठाण्याच्या तुरुंगात टाकले. प्रत्येकाच्या घरातील भांडीकुंडी जप्त करून माफीनामा लिहून दिला तरच सुटका होण्याचे फर्मान काढले. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन